शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:41 IST

यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.

पुणे : यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.त्यांच्या या हट्टापायी अधिवेशानाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या हे काय चाललय असा सवालही त्यांनी केला. शेतकरी वर्गाला दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्य निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी अजित पवार म्हणाले की,नागपूर येथील अधिवेशन मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केले आहे.आपण कुठल्या काळात आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये नालेसफाई झाली नसल्याने ही अवस्था ओढवली.नागपूरपासून दिल्ली पर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबले आहे.याला जबाबदार कोण आहे.असा सवाल देखील उपस्थित केला.ज्या नागपूराचे केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ही अवस्था एका पावसाने केली.तर राज्यातील सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा खरपूस समाचार देखील त्यांनी घेतला.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे -

  • कालचा दिवस सिडको व्यवहाराच्या गोंधळात गेला, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळं सांगितलं, आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सिडकोची हजारो कोटींची जमीन  जमीन मातीमोल भावात देण्यात आली. 
  • पाणी साचल्यानंतर आज ड्रेनेज साफ  करताना दारूच्या बाटल्या सापडल्या, हे दुर्दैवी आहे. आज संपूर्ण नागपूर जलमय झालं आहे. 
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चुनावी जुमले पुन्हा सुरू झाले आहेत, हमीभावाच दिडपड देऊ सांगितलं जातं पण यातही घोळ आहे. 
  • शिवसेनेचे आमदारही नाराजी व्यक्त करत म्हणले हे मुंबईत झालं असतं तर आमच्यावर टिकेची झोड उठली असती, पण मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने काही शब्द नाही.
  • कामकाजावर केला जाणार लाखोंचा खर्च वाया जात आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८