शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे अधिवेशन बालहट्टामुळे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:41 IST

यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.

पुणे : यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.त्यांच्या या हट्टापायी अधिवेशानाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या हे काय चाललय असा सवालही त्यांनी केला. शेतकरी वर्गाला दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्य निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी अजित पवार म्हणाले की,नागपूर येथील अधिवेशन मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केले आहे.आपण कुठल्या काळात आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये नालेसफाई झाली नसल्याने ही अवस्था ओढवली.नागपूरपासून दिल्ली पर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबले आहे.याला जबाबदार कोण आहे.असा सवाल देखील उपस्थित केला.ज्या नागपूराचे केंद्रीयमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ही अवस्था एका पावसाने केली.तर राज्यातील सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा खरपूस समाचार देखील त्यांनी घेतला.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे -

  • कालचा दिवस सिडको व्यवहाराच्या गोंधळात गेला, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळं सांगितलं, आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सिडकोची हजारो कोटींची जमीन  जमीन मातीमोल भावात देण्यात आली. 
  • पाणी साचल्यानंतर आज ड्रेनेज साफ  करताना दारूच्या बाटल्या सापडल्या, हे दुर्दैवी आहे. आज संपूर्ण नागपूर जलमय झालं आहे. 
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चुनावी जुमले पुन्हा सुरू झाले आहेत, हमीभावाच दिडपड देऊ सांगितलं जातं पण यातही घोळ आहे. 
  • शिवसेनेचे आमदारही नाराजी व्यक्त करत म्हणले हे मुंबईत झालं असतं तर आमच्यावर टिकेची झोड उठली असती, पण मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने काही शब्द नाही.
  • कामकाजावर केला जाणार लाखोंचा खर्च वाया जात आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८