शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बंद घाटामुळे रोज भोर एसटी आगाराला ३५ हजारांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:47 IST

घाट बंद असल्याने भोर एसटी आगाराच्या दररोजच्या तीन गाड्या बंद झाल्यामुळे आगाराला दररोज ३० ते ३५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.

भोर : भोर-महाड रोडवरील वरंध घाट दरडी पडून रस्ता खचल्याने नादुरुस्त असल्यामुळे मागील १५ दिवसांपासून बंद असून कधी दुरुस्त होईल हे सांगता येत नसल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना व भाजीपाल्यासह इतर व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर घाट बंद असल्याने भोर एसटी आगाराच्या दररोजच्या तीन गाड्या बंद झाल्यामुळे आगाराला दररोज ३० ते ३५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.  मागील १५ दिवसांपासून भोर एसटी आगाराच्या स्वारगेट-भोर-महाड सकाळी ६ वाजता व ७.४५ वाजता, तर दुपारी ३.३० वाजताची स्वारगेट-भोर-महाड-पोलादपूर गाडी अशा तीन गाड्या बंद आहेत. यामुळे दररोज ८ फेऱ्यांप्रमाणे ८२३ किलोमीटरचा प्रवास थांबला असून भोर आगाराचे दररोज ३० ते ३५ हजारांचे नुकसान होत असल्याचे भोर एसटी आगाराच्या आगारप्रमुख स्वाती आवळे यांनी सांगितले. तर, भोर तालुक्यातील दुर्गाडी भागातील रस्ता खराब झाल्याने सकाळी ८.१५ वाजता, दुपारी २.४५ वाजता व सायंकाळी ६ वाजताची दुर्गाडी गाडी कुडलीपर्यंतच जाते. त्यामुळे येथील नागरिकांना व मुलांना पाच ते सहा किलोमीटर चालत जावे व यावे लागत आहे.  रायरी गावाला जाणारी दुपारी १२.४५ वाजताची एसटी रस्त्याच्या कामामुळे दुपारी व संध्यकाळी जात नसल्यामुळे गावातील ३० ते ३५ मुलांना रायरी गावाच्या फाट्यावरून दोन किलोमीटर दररोज सकाळी व संध्याकाळी पुन्हा २ किलोमीटर चालत यावे लागत आहे.एसटी तास-दोन तास उशिराने सोडली जाते, तर भोर-महाड रोडवरील शिरगाव येथे रस्ता खचल्यामुळे एसटी गाडी शिरगावपर्यंतच जात असल्याने शिळिंब व परिसरातील हिर्डोशी येथील विद्यालयात येणाºया मुलांना ७ किलोमीटर चालत येऊन पुन्हा ७ किलोमीटर असे १४ किलोमीटर दररोज चालत जावे लागत आहे.यामुळे मुलांचे व काही कामानिमित्त नीरा-देवघर धरण भागात येणाºया प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे महाड रोडवरील रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे.  वरंध घाटातील भोर हद्दीत चार ते पाच ठिकाणी दरडी पडल्या होत्या, त्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, शिरगाव गावाजवळ व पवार हॉटेलच्या जवळही खचलेला रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात आला, त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करणे याशिवाय रस्त्याला पडलेले खड्डे भरणे महत्त्वाचे आहे.तर महाड तालुक्याच्या हद्दीत रस्त्यावर वारंवार दरडी पडत असून अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात रस्ता खचला आहे.याची पाहणी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून वरंध घाटाचे सर्वेक्षण शासनाच्या भूगर्भ शास्त्रा कडून करण्यात आले आहे.मात्र, त्याचा अहवाल अद्याप आला नसून त्यांचा अहवालाच घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे वरंध घाटातील वाहतूक कायमस्वरुपी बंद होते की काय, अशी शंका प्रवाशांच्या मनात येत आहे.भोर-गुढे-निवंगण ते कुडली बुदुक काठरस्ता मार्गाने पोलादपूरला रस्ता हा एक चांगला आणी कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग असून मागील १५ ते २० वर्षांपूर्वी सदरच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.मात्र, पुढील काम बारगळल्याने हा रस्ता होऊ शकला नाही. सदरच्या रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण करुन रस्ता करण्याची मागणी होत आहे.  ....भोरवरून महाडला वाहतूक बंद झाल्याने भाजीपाला घेऊन जाणारे व्यापारी,कोकणात जाणारे प्रवासी व पर्यटक यांना ताम्हिणी घाटातून जावे लागते.यामुळे प्रवास खर्च अधिक प्रमाणात वाढत आहे. 2याचा भुर्दंड पर्यटक व प्रवाशांना बसत आहे. या शिवाय घाटातील नादुरुस्त रस्ते घाटात दरड कोसळ्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे सदरचा घाटही धोकादायक आहे.  3सह्याद्रीच्या रांगांमध्ये मागील अनेक वर्षांपासून होत असलेले बदल घाट माथा परिसरात केलेले उत्खनन, निर्सग संपत्तीची हानी, झाडांची होत असलेली तोड जमिनीची होणारी धूप यामुळे सदरचा घाटा दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. यावर शासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस