शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

दुष्काळी परिस्थिती : चासकमानचे दुसरे आवर्तन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:18 IST

खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले.

चासकमान : खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले. धरणात सध्या ४४.१२% टक्के अर्थात ४.३० टीएमसी इतका पाणीसाठी राहिला आहे. त्यातील ३.३४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला (७.४४) टीएमसी शिल्लक होता.चासकमान धरणाची पाणी पातळी निम्यावर आल्यामुळे धरणा अंतर्गत असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण होऊन पिके संकटात आल्यामुळे चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत धरण प्रशासनाने त्वरित बैठक घेऊन धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन बंद केले.चासकमान धरणा मधून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेड सह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणी नुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरिप हंगामाचे पहिल्या आवर्तनाची गरज पुर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसानंतर अथर्तत १२ आँक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात होते. परंतु शिरुर तालुक्यातील शोतक-यांच्या मागणीमुळे २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्या द्वारे पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणी टंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती होण्याचे चित्र असल्याने शुक्रवारी आवर्तन बंद करण्यात आले.रब्बी हंगामातील शेतक-यांच्या मागणी नुसार जोडून सुरु असलेल्या अवर्तनाचा शेतकºयांना मोठा फायदा झाला. या जोड आवर्तनामुळे मेथी, कोथीबीर,फ्लावर, कोबी, मिरची, आदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. शिरुर व खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेता मध्ये खोदून तयार करण्यात आलेली शेततळी भरुण ठेवल्याने उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाईवर मात करता .येणार आहे. शिवाय, रब्बी हंगामाचे आवर्तन सूरु असल्याने चास, कमान, मोहकल,कान्हेवाडी, कडधे, आखरवाडी, तिन्हेवाडी, सांडभोरवाडी, रेटवडी, आदी गावासह शिरुर तालुक्यातील कालव्या अंतर्गत असलेल्या अनेक गांवांतील पाणी पुरवठा करणाºया योजनेचा फायदा झाला. त्यामुळे येथील शेतक-यांनी धरण प्रशासन व अधिका-यांचे धन्यवाद व्यक्त केले.धरण उशाशी कोरड घशाशीचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्यामुळे धरणाअंतर्गत असलेल्या शेतकºयांना आपल्या पिके जगविण्यासाठी तारेवरची कसरत करून पाणी द्यावे लागत आहे . गावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील दोन सलगच्या आवर्तनामुळे संकटात आले आहे. त्यामुळे धरणाजवळील गावांची अवस्था धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली आहे....अशी झाली पाण्याची घटरब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर आणि एकूण पाणीसाठा २०७.७३ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा १८०.५४ दलघमी इतका होता. सध्या धरणा मध्ये ४४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी ६४१.३२ मीटर आहे एकुण पाणीसाठा १२१.८४ दलघमी तर उपयुक्त साठा ९४.६५ दलघमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी धरणामध्ये ४० टक्के साठा कमी शिल्लक आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी