शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:37 PM

भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त...

दौंड (पुणे) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत जनता अस्वस्थ आहे; मात्र भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, शासन आपल्या दारी यासह अन्य काही माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार केवळ प्रसिद्धी करून टिमकी वाजवत आहे; मात्र दुष्काळी दौरा करायला त्यांना वेळ नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. राज्यात पाऊस नाही, तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली पाहिजे. मराठा, धनगर समाज यासह अन्य काही समाजांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सध्याचे शासन अपयशी ठरलेले आहे. जनतेचा उद्रेक वाढत चाललेला आहे. विरोधकांवर ईडीची कारवाई केली जाते, मग भाजपसारख्या पक्षात ईडीची कारवाई करण्याइतपत राजकीय मंडळी नाही का, असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे कारनामे सत्तेपुढे दडपले जात आहेत. तेव्हा भाजपचे दडपलेले कारनामे जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केवळ पैशांची उधळपट्टी करून जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कररीत्या सध्याचे शासन दुर्लक्ष करीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलेही नियोजन नसलेले हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेले असून या सरकारला निश्चितच जनता विचारेल. भाजपने प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून राजकारणासह समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसdaund-acदौंड