शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात पाऊस पडून देखील दुष्काळजन्य परिस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:50 IST

जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत.

ठळक मुद्देजुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू

पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी खेड तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाच्या अभावामुळे शेतीबाबत परिस्थिती गंभीर आहे. मात्र, पाऊस पडूनही केवळ सातत्य नसल्याने जुन्नर, वेल्ह्यासह काही ठिकाणची भातासह इतर पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. जिल्हयातील मावळ, मुळशी, खेड तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने तेथील भात पीक वाया गेले आहे. त्यामुळे या तालुक्यातही शासनाची मदत पोहचवली जाणार आहे. वेल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. बुधवार अखेरीस (दि. २४) गुंजवणी धरणात ३ अब्ज घनफूट (८३ टक्के) पाणीसाठा आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात पाऊस झालाच नाही. परिणामी येथील पिके देखील संकटात सापडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय ६० लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जानेवारीपर्यंत पुरू शकणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळजन्य दहा तालुक्यांपैकी इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे या दहा तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस