शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वाहनचालक झाले ‘आऊट आॅफ कंट्रोल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 01:15 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत.

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी त्यावर अंकुश ठेवता आलेला नाही. या भरधाव वेगापायी अनेकांना जीव गमवावा लागत असूनही बेशिस्त वाहनचालक ताळ्यावर येताना दिसत नाहीत.शहरात दोन दिवसांत झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी खराडी येथे भरधाव वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने आजी व नातवाचा बळी गेला. तर गुरुवारी रात्री सातारा रस्त्यावर दुचाकीवरून चाललेल्या दोघा मित्रांना अपघातात प्राण गमवावे लागले. या घटना शहर व परिसरात सातत्याने घडतात. एखाद्या ठिकाणी लवकर पोहचण्याची घाई, वाहन वेगात चालविण्याचे थ्रील, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहन वेडेवाकडे चालविणे यांमुळे लहान-मोठे अपघात होतात. पोलिसांकडून असे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कारवाई केली जाते. पण, याकडे वाहनचालकांकडून सर्रासपणे दुर्लक्ष करतात.काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक वाहनचालकांना संयम नसल्याचे दिसून आले. सिग्नलवर उभे असलेले वाहनचालक पुढे जाण्यासाठी सातत्याने हॉर्न वाजवून समोरच्या वाहनचालकांनाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास भाग पाडतात. अनेकदा सिग्नल तोडून वेगात पुढे जाणारे वाहनचालक शहरातील रस्त्यांवर नेहमी दिसतात. वर्दळीच्या रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत दुचाकी चालविणे तरुणही आहेत. तर रात्रीच्या वेळी रिकाम्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवरून वेगाने जाणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाºया वाहनचालकांचाही अनेकदा अपघात झाला आहे. पण त्यानंतरही अशा वाहनचालकांना धडा मिळालेला नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच शहरांतील रस्त्यांवर रॅश ड्रायव्हिंग करणाºया बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पण त्यामुळे या वाहनचालकांसह इतर निष्पाप नागरिकांचाही बळी जात आहे. मद्यपान करून वाहन चालविणाºयांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. यावर्षी आॅगस्टअखेरपर्यंत ९ हजार १३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून शहरात अधूनमधून नाकाबंदी करून संबंधितांना पकडले जाते. पण त्यानंतरही मद्यपी वाहनचालक बिनदिक्कतपणे वाहन चालवत असतात.>रॅश ड्रायव्हिंगप्रकरणीपोलिसांनी केलेली कारवाईमहिना वाहनचालक दंड वसुलीजानेवारी ७१७ ७,१७,०००फेब्रुवारी २५२ २,५२,०००मार्च २९६ २,९६,०००एप्रिल ४११ ४,११,०००मे ५४५ ५,४५,०००जून ४१९ ४,१९,०००जुलै ४२५ ४,२५,०००आॅगस्ट ६७२ ६,७२,०००एकूण ३,७३७ ३७,३७,०००>तीन हजार वाहनचालकांवर कारवाईरॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पोलिसांनी जानेवारी महिन्यापासून आॅगस्ट अखेरपर्यंत ३ हजार ७३७ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून ३७ लाख ३७ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आता बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.>वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणांचा तपास देखील जलद गतीने होत आहे. त्यामुळे आता नियमभंग केल्यानंतर दंड भरून वाहन चालकांची सुटका होईलच असे नाही. वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० चालकांचे पासपोर्ट थांबविण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे.-तेजस्वी सातपुते, उपायुक्त, वाहतूक शाखा