शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Kerala Floods: केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला, पुण्यातून जाणार प्यायचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 10:57 IST

Kerala Floods: केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे.

पुणे - केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाईल.

केरळ राज्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेनेही हातभार लावला आहे. रेल्वे कडून ठिकठिकाणाहून केरळला पिण्याचे पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातूनही आज ७ लाख लिटर पाणी रेल्वेने पाठविले जाणार आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेच्या १४ टँक वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी भरण्याचे काम पूर्ण होईल. रेल्वेकडे उपलब्ध असलेले तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आणलेले पाणी वॅगनमध्ये भरले जात आहे. एका वॅगनमध्ये सुमारे ५० हजार लिटर पाणी भरले जाते.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचार्यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणेWaterपाणी