शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Kerala Floods: केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला, पुण्यातून जाणार प्यायचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 10:57 IST

Kerala Floods: केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे.

पुणे - केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाईल.

केरळ राज्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेनेही हातभार लावला आहे. रेल्वे कडून ठिकठिकाणाहून केरळला पिण्याचे पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातूनही आज ७ लाख लिटर पाणी रेल्वेने पाठविले जाणार आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेच्या १४ टँक वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी भरण्याचे काम पूर्ण होईल. रेल्वेकडे उपलब्ध असलेले तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आणलेले पाणी वॅगनमध्ये भरले जात आहे. एका वॅगनमध्ये सुमारे ५० हजार लिटर पाणी भरले जाते.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचार्यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणेWaterपाणी