शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लाखो तरुणांचे स्वप्न; पण सरकारलाच नाही गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

शासन दरबारी विविध विभागांतील दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार रिक्तपदे भरण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ...

शासन दरबारी विविध विभागांतील दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार रिक्तपदे भरण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. नोकरीच्या आशेने डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना एक प्रकारचा दिलासादेखील देता येत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या वर्ग गट ‘अ’ व ‘ब’ पदांची भरती करण्यासाठी स्वायत्त दर्जा देऊन स्थापन करण्यात आलेल्या एमपीएससीकडे किमान वर्षभराच्या परीक्षांचे नियोजनदेखील नाही. सामान्य प्रशासन विभागाकडून वेळच्या वेळी रिक्त पदे भरण्याबाबतचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवले जात नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार आहेत?, किती काळ लागणार आहे?, निवड होऊनही नियुक्ती कधी मिळणार ?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ना एमपीएससीकडे आहेत, ना राज्य सरकारकडे. त्यामुळे दिवसरात्र अभ्यास करणारा उमेदवार यामध्ये भरकटला जात आहे. उमेदीची वर्ष यामध्ये घालवत आहे. त्याच्या हातात शेवटी अपयश पदरी पडले तर पुढे काय कर करावे ? या चिंतेने नैराश्य येत आहे. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करणारा, मोकळ्या हाताने समाजाचे टोमणे खात आयुष्य धकाधकीत जगत आहेत. अशी अनेक उदाहरणे समाजात आहेत. यासाठी शाश्वत धोरण आखण्याची गरज असून वेळीच युवा पिढीला सावरण्याची गरज आहे.

राज्य सरकारचे स्पर्धापरीक्षेसाठी धोरण ठरलेले असावे

स्पर्धा परीक्षेतून उमेदवारांना सरकार किती प्रमाणात नोकरी देऊ शकणार आहे, याचे धोरण ठरविण्याची गरज आहे. रिक्त पदांचा तपशील हा उघड असला पाहिजे. त्यानुसार भरती प्रक्रिया वेळच्या वेळी राबविता येऊ शकते. यासाठी तामिळनाडू लोकसेवा आयोगाचे अनुकरण करावे. कंत्राटी पद्धतीने भरती न करता कायमस्वरूपी करावी. जेवढ्या पदांची भरती एमपीएसीकडून करता येतील तेवढी करावी. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. यासाठी केरळ लोकसेवा आयोग पॅटर्न राबवावा. सेवा प्रवेश नियम डावलून तदर्थ पदोन्नती धोरण राबवून पदभरती राबवून स्पर्धापरीक्षा उमेदवारांवर अन्याय केला जात आहे. यावर कडक शासन करण्याची गरज आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मेघा भरतीची प्रक्रिया जलद गतीने सुरू करावी.

एमपीएससी एक स्वायत्त संस्था

एमपीएससी ही एक वैधानिक संस्था असून, तिला स्वायत्ततेचा दर्जा आहे. त्यामुळे या संस्थेचा मन राखला गेला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या लढाईत अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा एमपीएसीला विश्वासात घेऊन घेणे अपेक्षित असताना तिला अंधारात ठेऊन निर्णय घेतले. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अनेक पदांच्या परीक्षा एमपीएससीच्या कार्यकक्षेतील असताना थेट यंत्र नेमून भारती प्रक्रिया राबविली गेली. त्यामुळे सरकारच्या भरती प्रक्रियेवर शंका घेतली जाऊ लागलेली आहे. महत्त्वाच्या पद भरती करणाऱ्या संस्थेचा स्वायत्त दर्जा टिकलचा पाहिजे, असा मत प्रवाह आहे.

एमपीएसीने यूपीएससीचे अनुकरण प्रभावीपणे करण्याची गरज

यूपीएससी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करते. तसे एमपीएससीने करावे. त्याचे तंतोतंत पालन करावे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएसीनेदेखील परीक्षा देण्यावर मर्यादा घातल्या. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यूपीएससीने सीसॅट पेपर पात्र केला. त्याच धर्तीवर एमपीएससीने सीसॅट पात्र करावा, अशी मागणी उमेदवारांची मागणी गेल्या पाच वर्षांपासूनची आहे.

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी युवा धोरण

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून उमेदवारांच्या बैद्धिक पातळीत वाढ होते. तसेच मानसिकदृष्ट्या वैचारिक विकास होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी विशेष युवा धोरण ठरविण्याची मागणी होऊ लागली आहे. अभ्यासातून परिपक्वता असलेल्या या घटकाला कुठेतरी सामावून घेण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योग संस्था आणि सामाजिक संस्था, कैशल्य विकास यांची सांगड घालून या घटकाला व्यावसायिक दृष्टीने सामावून घेऊन त्यांना त्यांच्या बुद्धीनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती मोठी असायला हवी. तसेच गाव व तालुकास्तरावर अभ्यासिका व ग्रंथसाहित्य उपलब्ध करावे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये शिक्षण विभागासाठी करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठीदेखील काही अंशी तरतूद असली पाहिजे.

- अमोल अवचिते