शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आता संपूर्ण वर्षभर सुरु राहणार बालनाट्य कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:40 IST

बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते.

पुणे : बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. यावर बालरंगभूमी परिषद पुणे शाखेने एक उत्तम पर्याय शोधला असून, केवळ हंगामापुरत्याच या कार्यशाळा मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर या कार्यशाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे (मुंबई) अध्यक्ष प्रकाश पारखी आणि परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष उदय लागू यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अरूण पटवर्धन, कार्यकारी सदस्य देवेंद्र भिडे आणि दिपाली शेळके उपस्थित होते.पारखी म्हणाले, आज काही शाळा सोडल्या तर बहुतांश शाळांमध्ये चित्रकला आणि संगीत या व्यतिरिक्त इतर कलांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. नाटक हा विषय शाळांमध्ये शिकविलाच जात नाही, हे वास्तव आहे. यातच  संगीत आणि नृत्य कलांसाठी शासनमान्य परीक्षा आहेत पण नाट्यकलांसाठी कोणत्याही परीक्षा नाहीत. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे प्रत्येक वयोगटातील मुलांकरिता ’बालनाट्य संस्कार,  ‘किशोर नाट्यसंस्कार’ आणि कुमार नाट्यसंस्कार असा तीन परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमानुसार कार्यशाळा  झाल्यानंतर मुलांच्या परीक्षा घेतल्या जातात. याच अभ्यासक्रमानुसार आता बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या वतीने 7 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी वर्षभर ज्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्यानंतर दर तीन महिन्यांनी कार्यशाळेत सहभागी विद्याथर््यांचे सादरीकरण होणार असून, वर्षाच्या शेवटी विद्याथर््यांची शंभर महिन्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.  या परीक्षेमध्ये वाचिक,कायिक अभिनय, कथावाचन, अभिवाचन यांचा समावेश असेल. या परीक्षा नाट्यसंस्कार संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातील.शाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावाशाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावा यासाठी वर्षभरापूर्वी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम शासनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. मात्र तो शासनदरबारीच धूळ खात पडून आहे. त्यावर कोणत्याच  प्रकारची हालचाल झाली नसल्याची खंत प्रकाश पारखी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे