शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आता संपूर्ण वर्षभर सुरु राहणार बालनाट्य कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:40 IST

बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते.

पुणे : बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. यावर बालरंगभूमी परिषद पुणे शाखेने एक उत्तम पर्याय शोधला असून, केवळ हंगामापुरत्याच या कार्यशाळा मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर या कार्यशाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे (मुंबई) अध्यक्ष प्रकाश पारखी आणि परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष उदय लागू यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अरूण पटवर्धन, कार्यकारी सदस्य देवेंद्र भिडे आणि दिपाली शेळके उपस्थित होते.पारखी म्हणाले, आज काही शाळा सोडल्या तर बहुतांश शाळांमध्ये चित्रकला आणि संगीत या व्यतिरिक्त इतर कलांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. नाटक हा विषय शाळांमध्ये शिकविलाच जात नाही, हे वास्तव आहे. यातच  संगीत आणि नृत्य कलांसाठी शासनमान्य परीक्षा आहेत पण नाट्यकलांसाठी कोणत्याही परीक्षा नाहीत. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे प्रत्येक वयोगटातील मुलांकरिता ’बालनाट्य संस्कार,  ‘किशोर नाट्यसंस्कार’ आणि कुमार नाट्यसंस्कार असा तीन परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमानुसार कार्यशाळा  झाल्यानंतर मुलांच्या परीक्षा घेतल्या जातात. याच अभ्यासक्रमानुसार आता बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या वतीने 7 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी वर्षभर ज्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्यानंतर दर तीन महिन्यांनी कार्यशाळेत सहभागी विद्याथर््यांचे सादरीकरण होणार असून, वर्षाच्या शेवटी विद्याथर््यांची शंभर महिन्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.  या परीक्षेमध्ये वाचिक,कायिक अभिनय, कथावाचन, अभिवाचन यांचा समावेश असेल. या परीक्षा नाट्यसंस्कार संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातील.शाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावाशाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावा यासाठी वर्षभरापूर्वी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम शासनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. मात्र तो शासनदरबारीच धूळ खात पडून आहे. त्यावर कोणत्याच  प्रकारची हालचाल झाली नसल्याची खंत प्रकाश पारखी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे