शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 19:12 IST

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे.

पुणे : एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

   विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुणे पोलिसांनी गोवा येथील घरात घेतलेला शोधही विनावॉरंट घेण्यात आला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, असा अर्ज डॉ. तेलतुंबडे यांनी न्यायालयात केला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवादी संबंध असल्याचे संशयावरून तेलतुंबडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने चार आठवडयांचा दिलासा देत, अटकपूर्व जामिनासाठी संबंधित जिल्हास्तरीय न्यायालयात दाद मागावी असे सांगितले आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रात अर्जदार तेलतुंबडे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार