शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 21:00 IST

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प

ठळक मुद्दे विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड

नम्रता फडणीसपुणे: ' मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्मालो आलो. पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे उदगार आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. धर्मांतराच्या  भीमगर्जनेनंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मांतराचा साहित्य विश्वावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी अनेक कवी विविध अंगांनी शब्दबद्ध झाले..या विषयावरील 1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प बोधी नाट्य परिषदेने हाती घेतला आहे.' बोधी शतक' या नावाने आकाराला येत असलेला हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांना ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्माच्या धर्मगुरूंकडून आपल्या धर्मात येण्यासंबंधी विनंती करण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणा-या, मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणाऱ्या बौद्ध  धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मांतरानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावर  परिवर्तन घडले. गेल्या 64 वर्षात कविता कशी बदलत गेली.  याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा कवींचा  दृष्टीकोन कसा होता? म्हणजे श्रद्धा,   देवत्वच्या भावनेने  की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे  पाहिले गेले याचा शोध घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर,  बुद्ध आणि बौद्ध धर्म यांच्या विचारांच्या  काव्यात्मक अभिव्यक्तीचा धांडोळा या प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती  प्रकल्प समन्वयक आणि  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.   ते म्हणाले, या प्रकल्पात 1956 ते 2019 पर्यंत डॉ आंबेडकर यांच्याविषयीच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहे. विशिष्ट जाती, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन कवितांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे बा.सी मर्ढेकर, राजानंद गडपायले, सुरेश भट, यशवन्त मनोहर, कवी ग्रेस यांपासून ते नंतरच्या काळातील  रवींद्र लाखे, मीनाक्षी पाटील, नीरजा, आशालता कांबळे, चेतन पिंपळापुरे अशा अनेक कवींच्या कवितांचा समावेश यात करण्यात आला आहे. कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता थेट विषयाला भिडणाऱ्या नसल्या तरी त्यांच्या विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे काम पूर्ण झाले असून, प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. एका कवितेबद्दल दोन विभिन्न प्रकारचे दृष्टीकोन असू शकतात..म्हणून दोन प्रस्तावना देण्यात येणार आहेत. टाळेबंदी हटल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य