शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 21:00 IST

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प

ठळक मुद्दे विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड

नम्रता फडणीसपुणे: ' मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्मालो आलो. पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे उदगार आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. धर्मांतराच्या  भीमगर्जनेनंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मांतराचा साहित्य विश्वावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी अनेक कवी विविध अंगांनी शब्दबद्ध झाले..या विषयावरील 1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प बोधी नाट्य परिषदेने हाती घेतला आहे.' बोधी शतक' या नावाने आकाराला येत असलेला हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांना ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्माच्या धर्मगुरूंकडून आपल्या धर्मात येण्यासंबंधी विनंती करण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणा-या, मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणाऱ्या बौद्ध  धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मांतरानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावर  परिवर्तन घडले. गेल्या 64 वर्षात कविता कशी बदलत गेली.  याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा कवींचा  दृष्टीकोन कसा होता? म्हणजे श्रद्धा,   देवत्वच्या भावनेने  की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे  पाहिले गेले याचा शोध घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर,  बुद्ध आणि बौद्ध धर्म यांच्या विचारांच्या  काव्यात्मक अभिव्यक्तीचा धांडोळा या प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती  प्रकल्प समन्वयक आणि  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.   ते म्हणाले, या प्रकल्पात 1956 ते 2019 पर्यंत डॉ आंबेडकर यांच्याविषयीच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहे. विशिष्ट जाती, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन कवितांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे बा.सी मर्ढेकर, राजानंद गडपायले, सुरेश भट, यशवन्त मनोहर, कवी ग्रेस यांपासून ते नंतरच्या काळातील  रवींद्र लाखे, मीनाक्षी पाटील, नीरजा, आशालता कांबळे, चेतन पिंपळापुरे अशा अनेक कवींच्या कवितांचा समावेश यात करण्यात आला आहे. कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता थेट विषयाला भिडणाऱ्या नसल्या तरी त्यांच्या विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे काम पूर्ण झाले असून, प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. एका कवितेबद्दल दोन विभिन्न प्रकारचे दृष्टीकोन असू शकतात..म्हणून दोन प्रस्तावना देण्यात येणार आहेत. टाळेबंदी हटल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य