शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 13:18 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे७२ वर्षांपासूनची मागणी; ड्रोनद्वारे सर्वेक्षण

जुन्नर : जुन्नरहूनमुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणाऱ्या दाऱ्या घाटाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार  करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी शेवटच्या टप्प्यात दाऱ्या घाटाच्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १ कोटी ५८ लाख रुपयांचे काम दिलेले होते. दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाल्याने त्यानिमित्ताने जुन्नरकर नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. घाटमाथ्यावरील आंबोली, घाटघर, तर घाटाखाली पळू, सिंगापूर तसेच इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. येथे हे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले, पंकज सोमवंशी व सहकारी यांनी जीपीएस प्रणाली व ड्रोनने वापर करून हे सर्वेक्षण केले. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील जमिनीचा उंचसखलपणा, मातीपरीक्षण, पाषाणाचे स्वरूप अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आल्यावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचा अहवाल देण्यात येईल, असे महाले यांनी सांगितले.  

*जुन्नरकर नागरिकांचे स्वप्न असणारा दाºया घाट व्हावा, यासाठी आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची तिसरी पिढी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.

*आता आमदार शरद सोनवणे, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे तसेच सर्वपक्षीय मंडळी, सामाजिक संस्था विविध माध्यमांतून दाºया घाटासाठी पाठपुरावा करीत आहेत.

* विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या अहवालावर शासनाची मंजुरीची मोहर उमटवून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची तरतूद करावी, अशी जुन्नर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.  .........दाऱ्या घाटासाठी दिवंगत गणपत बोडके, भाऊसो निरगुडकर तसेच इतर मंडळींनी ब्रिटिशकाळात १९४५च्या दरम्यान नाणे घाट, दाऱ्या घाट व्हर्नाकुलर कंपनी स्थापन करून भागभांडवल गोळा केले होते.

*जुन्या पिढीतील कवी दिवंगत नारायण मते, विठ्ठल रासणे, बन्याबापू जोशी, हरिभाऊ शुक्ल यांनी हयातभर दाऱ्या घाटासाठी पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Junnarजुन्नरMumbaiमुंबईhighwayमहामार्ग