शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दारू पिऊ नका रे, असे सांगणाऱ्यांचेच मानधन बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:55 IST

दोन वर्षांपासून कीर्तन बंद...

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी राज्य सरकारने कीर्तनकारांची मदत घेण्याचे ठरवले होते. मात्र, मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात असे कीर्तन झाले नाही. त्यामुळे प्रबोधनाचे काम रखडले. कीर्तन न झाल्याने या कीर्तनकारांना मानधन मिळाले नाही. परिणामी त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कीर्तनकार हे राजकीय नेते, समाजसेवकांपेक्षाही जास्त संख्येने समाजाशी संवाद करतात. ते वर्षभरात सुमारे एक लाख लोकांशी बोलतात. ते व्यसनमुक्तीबाबत जनजागरण करू शकतात. मुळात प्रबोधनातून व्यसनमुक्ती ही संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. त्यामुळे कीर्तनकारच दारूबंदीचे आंदोलन जनसामान्यांपर्यंत पोचवू शकतात, या आशावादातून राज्य सरकारने कीर्तनकारांना या जनजागृतीसाठी मानधन तत्त्वावर नेमले.

दोन वर्षांपासून कीर्तन बंद

गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रबोधन तर सोडाच सामान्य परिस्थितीत होणारे कीर्तनही बंद होते. त्यामुळे सरकारने नेमलेल्या कीर्तनकारांना मानधन मिळत नव्हते. परिणामी त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

कीर्तनकारांना पाच हजार मानधन

या कामासाठी राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. मात्र, सामान्य कीर्तनासाठी एरवी कीर्तनकार एक हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात. गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गावागावांतून कीर्तन सुरू झाले आहे. साधारण जानेवारी ते मे असा कीर्तनांचा हंगाम असतो.

-आळंदी, देहूत वारकरी संस्था

पुणे जिल्ह्यात आळंदी व देहू ही तीर्थक्षेत्र असल्याने कीर्तनकार घडविणाऱ्या वारकरी संस्था या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातून तयार होणारे कीर्तनकार हे राज्यभर संतांचे विचार पोहचविण्याचे काम करतात. त्यातून प्रबोधनाचे कामही होते.

जिल्ह्यातील २०२१-२२ मधील दारूचा खप

प्रकार    खप (लाख लि.)

देशी            २७०.७

विदेशी     ३४८.७५

बीअर             ३५२.७९

वाईन             १६.७९

कीर्तन ही भगवंताची सेवा आहे. कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. त्यामुळे कीर्तनही बंद होते. कीर्तनकारांचा चरितार्थ त्यावरच चालतो. या काळातील मानधन न मिळाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदी