शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

जेजुरीत सालाबादप्रमाणे यंदाही भरला गाढवांचा बाजार, बाजाराला उतरती कळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 6:45 PM

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे .

ठळक मुद्देविविध जातींच्या गाढवांची खरेदी विक्री

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी -विक्री होत असली तरी ही गाढवांची संख्या कमी होती. केवळ ५०० गावठी व काठेवाडी जातीच्या गाढवांची खरेदी विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढया भावात विक्री होत होती. यामुळे लाखोंची बाजाराची उलाढाल झाली. 

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे . जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी -विक्री करतात. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान ,गुजरात कर्नाटक ,आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा ,सांगली ,कराड ,बार्शी ,नगर ,बारामती ,पुणे फलटण, जामखेड ,आदी ठिकाणांवरून वैदू ,वडारी , कैकाडी ,बेलदार (पाथरवट ) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी -विक्री बरोबरच देवदर्शन -कुलधर्म -कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. यंदा केवळ ५०० विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी —काठेवाडी जातीची  ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान,गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी -काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक -आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते.पूर्वीच्या काळी गारुडी ,कुंभार,परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी -विक्री करताना दिसतात.गाढवांच्या दातावरून त्याचे वयाचे अनुमान काढले जाते.

दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन ,तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात.रंगावरूनही किमत करण्यात येते.पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो.त्यानंतर गडद जांभळा ,तपकिरी लालसर,करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोरुपयांची उलाढाल होत असे. परंतु सध्या परिस्थिती तशी राहिली नाही.केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र आजच्या यांत्रिक युगात, औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती, यावर्षी ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :Jejuriजेजुरी