शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

जेजुरीत सालाबादप्रमाणे यंदाही भरला गाढवांचा बाजार, बाजाराला उतरती कळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:53 IST

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे .

ठळक मुद्देविविध जातींच्या गाढवांची खरेदी विक्री

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी -विक्री होत असली तरी ही गाढवांची संख्या कमी होती. केवळ ५०० गावठी व काठेवाडी जातीच्या गाढवांची खरेदी विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढया भावात विक्री होत होती. यामुळे लाखोंची बाजाराची उलाढाल झाली. 

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे . जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी -विक्री करतात. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान ,गुजरात कर्नाटक ,आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा ,सांगली ,कराड ,बार्शी ,नगर ,बारामती ,पुणे फलटण, जामखेड ,आदी ठिकाणांवरून वैदू ,वडारी , कैकाडी ,बेलदार (पाथरवट ) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी -विक्री बरोबरच देवदर्शन -कुलधर्म -कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. यंदा केवळ ५०० विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी —काठेवाडी जातीची  ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान,गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी -काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक -आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते.पूर्वीच्या काळी गारुडी ,कुंभार,परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी -विक्री करताना दिसतात.गाढवांच्या दातावरून त्याचे वयाचे अनुमान काढले जाते.

दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन ,तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात.रंगावरूनही किमत करण्यात येते.पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो.त्यानंतर गडद जांभळा ,तपकिरी लालसर,करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोरुपयांची उलाढाल होत असे. परंतु सध्या परिस्थिती तशी राहिली नाही.केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र आजच्या यांत्रिक युगात, औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती, यावर्षी ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :Jejuriजेजुरी