शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

अवयवदान करून नवरदेव बोहल्यावर! समाजात घालून दिला नवा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 5:39 PM

लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे.

तेजस टवलारकर- 

पिंपरी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतर अमूक करू, तमूक करू असे मनोदय संकल्प करणारी जोडपी आपण पाहिली असतील. मात्र, लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे. अवयवदान केल्याने कुणाला तरी दृष्टी मिळू शकते, कुणाला जीवनदान मिळू शकते, याचे भान ठेवून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने अवयदान करून नवा आदर्श घालून दिला आहे. 

जन्म-मृत्यू हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य असले, तरी एखाद्याला जीवनदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टरांना देव मानले जाते.  माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे मरावे परी, अवयवदानरुपी उरावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मोनीष कांबळे या तरुणाने लग्नाचे औचित्य साधून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. 

लग्नसोहळा म्हटलं की, जेवणावळी, बँडबाजा यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, हा खर्च टाळून सामाजिक संदेश देत मोनीष नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अवयव उपलब्ध न झाल्याने देशात अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा असते. पंरतु अवयव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अवयवदान दिन साजरा करताना प्रत्यक्षात दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, त्यातूनच हा निर्णय घेतला. 

अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी समोर येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही आपण जग बघू शकतो. अवयवदान केल्यास ते अवयव दुसऱ्यांसाठी उपयोगी येतात. अवयवदानामुळे मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या वनात आनंद भरू शकतो. यामुळे अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी जनजागृती करत राहणार आहे.- मोनीष कांबळे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOrgan donationअवयव दानmarriageलग्न