शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:18 IST

गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

पुणे : नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना केलेले सहाय्य, नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), राफेल घोटाळा यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका सामान्य लोकांच्या गळ्यात धोंडा बांधण्याची असल्याची दिसून येते. तर, भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) उमेदवार गिरीश बापट यांनी सत्तेवर आल्यावर कष्टकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. कोणत्याही उमेदवाराच्या आणि पक्षाच्या विरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याची आढावांची ही पहिलीच वेळ आहे. 

रिक्षा पंचायतीचे रावसाहेब कदम, हनुमंत बहिरट, गोरख मेंगडे यावेळी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, अन्नधान्य वितरण मंत्री झाल्यानंतर बापट यांनी ‘कष्टाची भाकर’चे रेश्निंग धान्य बंद करण्याचे काम केले. याबाबत त्यांना विनंती केल्यावर त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यावर राज्य सरकारला तसा आदेश दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बापट तोंडघशी पडले. त्यानंतरही धान्य सुरु झालेच नाही. परिणामी कष्टाची भाकर दुप्पटीहून अधिक महागली. महात्माफुले समता परिषदेला टिंबर मार्केट येथील १५ हजार चौरसफूट जागा महानगरपालिकेने मंजुर केली होती. त्यातही बापट यांनी खोडा घातला. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांशी बैठकीचे आश्वासन त्यांनी ऑक्टोबर २०१७ रोजी दिले होते. मात्र, ती बैठक कधी झालीच नाही. कष्टकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि फसव्या बापटांना पुणेकरांनी मतदान करु नये. 

केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा करण्याचे जाहीर केले. त्याला छत्री कायदा असे नाव दिले. मात्र, सामाजिक सुरक्षेची ही छत्री कधी उघडलीच नाही. मोदींच्या काळामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ झाली. देशांतर्गत आणि सीमेवरील ताणावात वाढला. लोकशाहीचा संकोच, शेतकरी आणि कामगारांची धुळधाण करणारे धोरण राबविण्यात आले. त्यामुळे कामगार आणि शेतमजुरांचे जीवनमान घातक पातळीवर आले आहे. उलट या सरकारच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणाचे काम झाल्याची टीका डॉ. आढाव यांनी केले. कष्टकरी विराेधी असलेल्या सरकारला धडा शिकवायला हवामोदींच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे चटके अंगमेहनती आणि कष्टकऱ्यांना बसले आहेत. चुलीवरची भाकर योग्य वेळी फिरवली नाही, तर करपते. त्यामुळे,कष्टकरी विरोधी असलेल्या सरकारला धडा शिकवायला हवा. मतदारांनी भाजपाला मतदान करु नये.डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणेgirish bapatगिरीष बापट