शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:04 IST

समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

ठळक मुद्दे सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली विशेष मोहीमबापट यांच्या हस्ते विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रांचे वाटप

पुणे : समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. त्यांच्या जगण्याला आधार देण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या योजना लाभदायी आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम कौतुकास्पद असून यापुढे पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत कसबा मतदार संघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, तहसीलदार अर्चना यादव, नायब तहसीलदार विलास भानोसे, नगरसेवक महेश लडकत, दीपक पोटे, राजेंद्र खेडेकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रांचे वाटप बापट यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिराच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तहसीलदार अर्चना यादव यांनी आतापर्यंत तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कचरा वेचक आदी कष्टकऱ्यांचे मेळावे घेऊन योजनेची माहिती दिली आहे. मोहिमेदरम्यान, विधवा, अपंग, परित्यक्त्या, क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग, तृतीयपंथी, एड्सग्रस्त, घटस्फोटीत अशा व्यक्तींवर लक्ष केंद्रित करुन त्यांना मदत करुन शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया १५ जानेवारी २०१८पर्यंत सुरु राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटSaurabh Raoसौरभ रावPuneपुणे