शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:04 IST

समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

ठळक मुद्दे सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली विशेष मोहीमबापट यांच्या हस्ते विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रांचे वाटप

पुणे : समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. त्यांच्या जगण्याला आधार देण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या योजना लाभदायी आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम कौतुकास्पद असून यापुढे पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत कसबा मतदार संघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, तहसीलदार अर्चना यादव, नायब तहसीलदार विलास भानोसे, नगरसेवक महेश लडकत, दीपक पोटे, राजेंद्र खेडेकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रांचे वाटप बापट यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिराच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तहसीलदार अर्चना यादव यांनी आतापर्यंत तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कचरा वेचक आदी कष्टकऱ्यांचे मेळावे घेऊन योजनेची माहिती दिली आहे. मोहिमेदरम्यान, विधवा, अपंग, परित्यक्त्या, क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग, तृतीयपंथी, एड्सग्रस्त, घटस्फोटीत अशा व्यक्तींवर लक्ष केंद्रित करुन त्यांना मदत करुन शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया १५ जानेवारी २०१८पर्यंत सुरु राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटSaurabh Raoसौरभ रावPuneपुणे