शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

न खाता-पिताच धावलो, लय आबदा झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:25 IST

सैन्यभरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल : १११ पदांसाठी संपूर्ण देशातून आले हजारो उमेदवार

पुणे : ‘चारशे मुलांची एक बॅच आणि त्यातून चारच लोक निवडले... धुरळ्यात पळायला लावले, नाका, डोळ्यांत, कानात नुसता धुरळाच धुरळा गेला... ना खायची सोय होती, ना पाण्याची सोय. सकाळी न खाता-पिताच आम्ही धावलो... लय आबदा झाली... या भावना आहेत सैन्य भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तरुणांच्या.

कॅम्प परिसरातील रेसकोर्स मैदानावर मराठा लाइट इन्फन्ट्री या प्रादेशिक सेनेच्या १०१ बटालियनद्वारे ही भरती आयोजित करण्यातआली आहे. आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये जवान ८९ पदे, क्लार्क, स्टाफ ड्यूटी २ पदे, जवान हेअर ड्रेसर्सची २ पदे, वॉशरमॅन १ पद आणि १२३ इन्फन्ट्री बटालियन ग्रेनेडर्समध्ये १५ जवानांची पदे भरली जाणार आहेत. इच्छुकांची शारीरिक परीक्षा आज (दि. ७) आणि उद्या (दि. ८) होत आहे. त्यानंतर ९ ते १२ आरोग्य तपासणी होणार आहेत. सोमवारी महाराष्टÑ, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दीव व दमण आणि लक्षद्वीप येथील तरुणांची भरती होती. मंगळवारी तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा आणि पॉँडेचेरी या राज्यांतील तरुणांची भरती होईल. ही भरती देशभरातील तरुणांसाठी असल्याने सात हजारांहून अधिक जण यासाठी पुण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री कॅम्प परिसर आणि रेसकोर्स परिसरात तरुणांचे जथे पाहायला मिळाले. रात्री रस्त्यांवरच झोपून रात्र काढली. या तरुणांसाठी कोणतीही सोय सैन्य दलातर्फे करण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्री खाण्याचे आणि पाण्याचे हाल झाले. अनेक ठिकाणी शेकोटी करून तरुण रात्रभर जागेच होते. तसेच सकाळीदेखील अनेक जण काहीच न खाता भरतीमध्ये सहभागी झाले होते.सर्व सोयी केल्याचा दावाभरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही सर्व सोय केली होती. त्यांच्या जेवणाची व पाण्याचीही सोय झाली असून, त्यांना कसलाही त्रास झाला नसल्याची माहिती सदर्न कमांडच्या अधिकाºयांनी दिली.चारशे जणांतून चार जणांची निवडच्भरतीच्या ठिकाणी चारशे जणांचे संघ तयार केले होते. या चारशे जणांना सुमारे अडीच किलोमीटर धावण्यास सांगण्यात येत होते.च्त्यातून पहिल्या चार जणांची निवड करण्यात येत होती. त्यानंतर त्यांची उंची आणि १० पुलअप्स करायला सांगितले जात होते.च्यातून निवडलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणी दोन दिवसांनी होणार आहे, असे तरुणांनी सांगितले.गावाकडं लय थंडीय, हितं कायच नाय...च्पुण्यात १० अंशाच्या आसपास रात्री थंडीचा पारा होता. तेव्हा या थंडीत तरुणांना रस्त्यावर झोपावे लागले. यावर तरुणांनी मात्र थंडीचा आनंद घेतल्याचे सांगितले. ‘‘इथं काय लय थंडी नाय हो, आमच्या गावाकडं या मग कळल थंडी किती असती ते. मोकळ्या रानात झोपतो आम्ही, आम्हाला कसली वाजतेय थंडी. इथं देशसेवा करण्यासाठी आलोय आम्ही, थंडी तर सीमेवर पण असणार की, त्याला काय भ्यायचं एवढं’’ अशा प्रतिक्रिया तरुणांनी दिल्या.मी आणि माझे दोन मित्र रविवारी रात्री पुण्यात आलो. येथे मैदानाच्या जवळच आम्ही रात्रभर थांबलो. खाण्याची आणि पाण्याची काहीच सोय नसल्याने लय आबदा झाली. सकाळीपण काहीच नव्हते, त्यामुळे न खाताच आम्ही धावलो. धावताना आमच्या समोर ट्रक असायचा, त्यामुळे खूप धूळ उडायची. ती डोळ्यांत, नाकात, कानात जात होती. धावण्यात आम्ही कमी पडलो, आता परत गावी जाणार. यापूर्वी कोल्हापूरच्या भरतीला गेलो होतो. ही दुसरी वेळ होती. मी बीएस्सी द्वितीय वर्षाला आहे. नोकरी नसल्याने सैन्यात भरती व्हायचे म्हणून प्रयत्न करतोय.- सुशांत सुरवे, सांगलीमराठवाड्यात यंदा पाऊसच पडला नाही. त्यामुळे पाणीच नाही. शेती करता येईना आणि धंदा तर काहीच नाही. मग करायचे काय म्हणून सैन्यभरतीसाठी आलोय. मी मोटार- सायकलवर आईसोबत उस्मानाबादवरून रात्री आलो. रात्री येथे काहीच सोय नव्हती. स्वच्छतागृहाची सोय हवी होती.- अरुण नागरगोजे, उस्मानाबाद 

टॅग्स :Puneपुणे