शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत तडजोड नको  : विशाल सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:31 IST

गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती.

ठळक मुद्देमान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य परिषदेसाठी निमंत्रित

पुणे : शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भवितव्य उज्ज्वल घडावे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासन लागेल ती मदत करायला तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड मुख्याध्यापकांनी करू नये असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले. गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती. जिल्हयातील मान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बालभारती तसेच विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर, उपसंचालक मिनाक्षी राऊत, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, सहायक शिक्षण निरीक्षक  प्रा. अनिल गुंजाळ, माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कशी हेरावी, विद्याार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे, विद्याार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक, मानसिक गरजा कशा ओळखाव्यात, शाळेत आनंदी वातावरण कसे ठेवावे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तसेच एकंदरीत शिक्षणाच्या गुणवत्तावाढीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वत: च्या मुलांचे भवितव्य घडवताना अनेक अडचणी येतात. तरीही पालक म्हणून त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे विशाल सोळंकी यांनी सांगितले. प्रा. अनिल गुंजाळ म्हणाले, विद्यार्थ्यांचे पाय पाळण्यात दिसतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता काय आहे, यावरून त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांपेक्षा आज शिक्षणाची वाईट अवस्था झाली असल्याची खंत शिवाजी तांबे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पध्दतीत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनात काळानुसार बदल घडणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर आरटीई प्रवेश तसेच शुल्क अधिनियम कायदा आणि विविध शिष्यवृत्त्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षण