शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

करा टीका, आमच्या अंगाला भोके पडत नाहीत : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 21:20 IST

अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पुणे : अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. मोदींना घराचा अनुभव नाही. आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. तसेच भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे वक्यव्यही पवार यांनी यावेळी केले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील,  नितीन राऊत, उल्हास पवार, प्रविण गायकवाड, अंकुश काकडे, रमेश बागवे, चेतन तुपे आदी उपस्थित होते. मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी व पवार कुटूंबियांवर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपुस समाचार घेतला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मोदींना ह्यतुम्ही काय केले हे सांगाह्ण असे आव्हान दिले.

पवार म्हणाले, विकासाचे मॉडेल दाखवून मोदींनी सत्ता मिळविली. पण त्यानंतर पाच वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यांना आपला शब्द न पाळल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. आम्ही कर्जमाफी केली पण हे श्रीमंतांचीच थकबाकी भरत आहेत. विकासावर न बोलता आपले अपयश लपविण्यासाठी प्रत्येक भाषणातील २० मिनिटे ते काँग्रेस नेतृत्वाला शिव्या देत आहेत. पण स्वत: काय केले हे सांगण्यासाठी मोदींकडे काहीच नाही. गांधी घराण्याच्या लाईनमध्ये आता मलाही आणत शिव्या देऊ लागले आहेत. आम्ही आमच्या आईच्या संस्कारात वाढलो आहेत. पण मोदींना घराचा अनुभव नाही. जे आहेत ते कुठे आहे माहीत नाही. कधीतरी फोटो दिसतो. आणि दुसºयाच्या घराची चौकशी करतात. आमची चिंता करू नका. कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. भाजपचा पराभव करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.ते घबाड गेले कुठेराफेल करारातील माहिती गुप्त असल्याचे मोदी सांगतात. पण त्या कराराच्या फाईलचे फोटो बाहेर येतात. हे देशाचे कसे संरक्षण करणार. विमानांची किंमत ३५० कोटींवरून १६५० कोटी केली. ज्यांनी कधी कागदाचे विमान केले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिले आहे. हे मधले घबाड गेले कुठे?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

मग कुलभूषण जाधव का सोडविले नाहीपंतप्रधान मोदी हे प्रत्येक गोष्टीला मी केले मी केले अशा अविभार्वात बोलत आहेत. पण ही ५६ इंची छाती कुलभुषण जाधवला असून का सोडवून आणू शकली नाही. सगळं मीच करतोय असे चित्र निर्माण करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस