शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

करा टीका, आमच्या अंगाला भोके पडत नाहीत : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 21:20 IST

अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पुणे : अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. मोदींना घराचा अनुभव नाही. आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. तसेच भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे वक्यव्यही पवार यांनी यावेळी केले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील,  नितीन राऊत, उल्हास पवार, प्रविण गायकवाड, अंकुश काकडे, रमेश बागवे, चेतन तुपे आदी उपस्थित होते. मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी व पवार कुटूंबियांवर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपुस समाचार घेतला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मोदींना ह्यतुम्ही काय केले हे सांगाह्ण असे आव्हान दिले.

पवार म्हणाले, विकासाचे मॉडेल दाखवून मोदींनी सत्ता मिळविली. पण त्यानंतर पाच वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यांना आपला शब्द न पाळल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. आम्ही कर्जमाफी केली पण हे श्रीमंतांचीच थकबाकी भरत आहेत. विकासावर न बोलता आपले अपयश लपविण्यासाठी प्रत्येक भाषणातील २० मिनिटे ते काँग्रेस नेतृत्वाला शिव्या देत आहेत. पण स्वत: काय केले हे सांगण्यासाठी मोदींकडे काहीच नाही. गांधी घराण्याच्या लाईनमध्ये आता मलाही आणत शिव्या देऊ लागले आहेत. आम्ही आमच्या आईच्या संस्कारात वाढलो आहेत. पण मोदींना घराचा अनुभव नाही. जे आहेत ते कुठे आहे माहीत नाही. कधीतरी फोटो दिसतो. आणि दुसºयाच्या घराची चौकशी करतात. आमची चिंता करू नका. कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. भाजपचा पराभव करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.ते घबाड गेले कुठेराफेल करारातील माहिती गुप्त असल्याचे मोदी सांगतात. पण त्या कराराच्या फाईलचे फोटो बाहेर येतात. हे देशाचे कसे संरक्षण करणार. विमानांची किंमत ३५० कोटींवरून १६५० कोटी केली. ज्यांनी कधी कागदाचे विमान केले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिले आहे. हे मधले घबाड गेले कुठे?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

मग कुलभूषण जाधव का सोडविले नाहीपंतप्रधान मोदी हे प्रत्येक गोष्टीला मी केले मी केले अशा अविभार्वात बोलत आहेत. पण ही ५६ इंची छाती कुलभुषण जाधवला असून का सोडवून आणू शकली नाही. सगळं मीच करतोय असे चित्र निर्माण करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस