शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

करा टीका, आमच्या अंगाला भोके पडत नाहीत : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 21:20 IST

अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पुणे : अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. मोदींना घराचा अनुभव नाही. आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. तसेच भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे वक्यव्यही पवार यांनी यावेळी केले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील,  नितीन राऊत, उल्हास पवार, प्रविण गायकवाड, अंकुश काकडे, रमेश बागवे, चेतन तुपे आदी उपस्थित होते. मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी व पवार कुटूंबियांवर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपुस समाचार घेतला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मोदींना ह्यतुम्ही काय केले हे सांगाह्ण असे आव्हान दिले.

पवार म्हणाले, विकासाचे मॉडेल दाखवून मोदींनी सत्ता मिळविली. पण त्यानंतर पाच वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यांना आपला शब्द न पाळल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. आम्ही कर्जमाफी केली पण हे श्रीमंतांचीच थकबाकी भरत आहेत. विकासावर न बोलता आपले अपयश लपविण्यासाठी प्रत्येक भाषणातील २० मिनिटे ते काँग्रेस नेतृत्वाला शिव्या देत आहेत. पण स्वत: काय केले हे सांगण्यासाठी मोदींकडे काहीच नाही. गांधी घराण्याच्या लाईनमध्ये आता मलाही आणत शिव्या देऊ लागले आहेत. आम्ही आमच्या आईच्या संस्कारात वाढलो आहेत. पण मोदींना घराचा अनुभव नाही. जे आहेत ते कुठे आहे माहीत नाही. कधीतरी फोटो दिसतो. आणि दुसºयाच्या घराची चौकशी करतात. आमची चिंता करू नका. कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. भाजपचा पराभव करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.ते घबाड गेले कुठेराफेल करारातील माहिती गुप्त असल्याचे मोदी सांगतात. पण त्या कराराच्या फाईलचे फोटो बाहेर येतात. हे देशाचे कसे संरक्षण करणार. विमानांची किंमत ३५० कोटींवरून १६५० कोटी केली. ज्यांनी कधी कागदाचे विमान केले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिले आहे. हे मधले घबाड गेले कुठे?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

मग कुलभूषण जाधव का सोडविले नाहीपंतप्रधान मोदी हे प्रत्येक गोष्टीला मी केले मी केले अशा अविभार्वात बोलत आहेत. पण ही ५६ इंची छाती कुलभुषण जाधवला असून का सोडवून आणू शकली नाही. सगळं मीच करतोय असे चित्र निर्माण करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस