शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पुणे जिल्ह्याचे विभाजन; शिवनेरी जिल्ह्याची मागणी, भाजपचा शिरूर लोकसभेवर डोळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:15 IST

पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय हेतू अधिक दिसून येतोय

हणमंत पाटील 

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे विभाजनाचा घाट घालण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी स्वतंत्र शिवनेरी जिल्ह्याची मागणी केली. त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ही मागणी स्वतंत्र बारामती विरुद्ध शिवनेरी जिल्हा नसून, भाजपचा शिरूर लोकसभा मतदारसंघावर डोळा असल्याची राजकीय चर्चा आहे. 

पुणे जिल्ह्याचा विस्तार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह १३ जिल्ह्यांत म्हणजे १५ हजार ६४३ चौरस किलोमीटर इतका आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पुणे जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या नागरिकांचे कामे होण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन करावे. त्यातून बारामती या स्वतंत्र जिल्ह्याची मागणी २०१४ला करण्यात आली. त्यावर चर्चा करण्यासाठी २०१६ला तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समिती स्थापन केली. मात्र, पुणे जिल्ह्यातून वेगळे होण्यास पुरंदर व भोर तालुक्यातून विरोध झाला. ही मागणी राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीला अडचणीची ठरणार असल्याने बारामतीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून रखडला आहे.

प्रस्तावित स्वतंत्र बारामती जिल्हा...

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, दौड, बारामती, इंदापूर, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूरमधून माळशिरस आणि साताऱ्यातून फलटण असा स्वतंत्र बारामती जिल्ह्याची मागणी होती. त्यानुसार बारामती येथे प्रशासकीय तयारी म्हणून पोलिस उपमुख्यालय, महसूल, आरटीओ, महावितरणची स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात आली. तसेच, स्वतंत्र न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नगररचना व पोलिस प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले. तसेच, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची इच्छा असूनही पुण्याहून वेगळे होण्यास पुरंदर व भोर तालुक्याचा विरोध आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने हा मुद्दा मागे पडला आहे.

नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय हेतू अधिक

पुण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा आहे. पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने घेतले जाते. त्यामुळे विभाजनाची मागणी चुकीची आहे. यामागे नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय हेतू अधिक दिसून येतो. - अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBaramatiबारामती