शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:21 IST

आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत.

पुणे  - आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत, ही खरंच धोकादायक बाब असून, जर जैवविविधता अबाधित ठेवायची असेल तर सर्र्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी व्यक्त केले. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जीविधता महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शास्त्रज्ञ पी. लक्ष्मीनरसिंह, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, भूगोल विभागप्रमुख रवींद्र जायभाये, डॉ. सचिन पुणेकर, रोटरीचे रवींद्र देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकारांनी काढलेले फोटोे प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. या वेळी जागतिक जलदिनानिमित्त ‘थेंब’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. महोत्सवात गुरुवारी जैविक आक्रमणे व त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच शुक्रवारी कुकडी नदी आणि सिद्धबेट आळंदी या ठिकाणी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कार्यशाळेसाठी आलेले मार्गदर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश करंदीकर, तर आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले.पुण्यामध्ये हिरवाईचे क्षेत्र कमी होत आहे. मोकळा श्वास केवळ वन विभागाने जपलेल्या क्षेत्रावरच घेता येतो. कारण त्या ठिकाणीच जैवविविधा जपली गेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यात विद्यार्थी, नागरिक, संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी आपली जबाबदारी घ्यावी.- विवेक खांडेकरदिवसेंदिवस पर्यावरणाचा होत चाललेला ºहास हा चिंताजनकच आहे. विद्यापीठात झालेल्या बांधकामानेदेखील या ठिकाणच्या पर्यावरणावर काही प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आम्ही मागील वर्षी टेकडीवर ३ हजार पाचशे झाडे लावली होती. परंतु उंदीरमारीसारख्या वनस्पतीमुळे त्यातील दहासुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत.- डॉ. नितीन करमळकर

टॅग्स :Natureनिसर्गenvironmentवातावरण