शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:21 IST

आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत.

पुणे  - आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत, ही खरंच धोकादायक बाब असून, जर जैवविविधता अबाधित ठेवायची असेल तर सर्र्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी व्यक्त केले. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जीविधता महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शास्त्रज्ञ पी. लक्ष्मीनरसिंह, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, भूगोल विभागप्रमुख रवींद्र जायभाये, डॉ. सचिन पुणेकर, रोटरीचे रवींद्र देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकारांनी काढलेले फोटोे प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. या वेळी जागतिक जलदिनानिमित्त ‘थेंब’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. महोत्सवात गुरुवारी जैविक आक्रमणे व त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच शुक्रवारी कुकडी नदी आणि सिद्धबेट आळंदी या ठिकाणी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कार्यशाळेसाठी आलेले मार्गदर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश करंदीकर, तर आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले.पुण्यामध्ये हिरवाईचे क्षेत्र कमी होत आहे. मोकळा श्वास केवळ वन विभागाने जपलेल्या क्षेत्रावरच घेता येतो. कारण त्या ठिकाणीच जैवविविधा जपली गेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यात विद्यार्थी, नागरिक, संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी आपली जबाबदारी घ्यावी.- विवेक खांडेकरदिवसेंदिवस पर्यावरणाचा होत चाललेला ºहास हा चिंताजनकच आहे. विद्यापीठात झालेल्या बांधकामानेदेखील या ठिकाणच्या पर्यावरणावर काही प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आम्ही मागील वर्षी टेकडीवर ३ हजार पाचशे झाडे लावली होती. परंतु उंदीरमारीसारख्या वनस्पतीमुळे त्यातील दहासुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत.- डॉ. नितीन करमळकर

टॅग्स :Natureनिसर्गenvironmentवातावरण