शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था, कमान पडून 4 मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:27 IST

स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळादुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे.

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेची कमान पडून शाळेतील चार मुले जखमी झाली आहेत. अशाच काही पुरंदर तालुक्यातील शाळांच्या धोकादायक इमारती आहेत. त्यात वाल्हे केंद्राच्या गायकवाडवाडी, अबाजीचीवाडी, मुकदमवाडी शाळांचा समावेश असून गायकवाडवाडीतील इमारत पावसाळ्यात सपूर्ण गळते. त्यामुळे स्लॅब काही प्रमाणात खाली आला असून, बाकी स्लॅब कधी कोसळेल हे सांगता येत नाही.

स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळादुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. तरी, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काही अनर्थ घडण्याअगोदर सदर शाळांची दुरुस्ती किंवा नवीन इमारतीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांसह शिक्षकांनी केली आहे. याबाबतचा सदर प्रस्ताव ग्रामपंचायतीला दिला असल्याची माहिती गायकवाडवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष रासकर यांनी दिली आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार उपस्थित होते.सरपंच अमोल खवले यांनी घटनास्थळी भेट देऊन इमारतीची पाहणी करून मुलांना या खोलीमध्ये बसवू नये, असे शिक्षकांना सांगितले. सदर इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरात लवकर पंचायत समितीकडे पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा