शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा; जयंत पाटलांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:47 IST

राज्यातील पूरस्थितीची स्वत: मुख्यमंत्री माहिती घेत असून वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत: जलसंपदामंत्री जयंत पाटील

पिंपरी : सांगली, कोल्हापूर मधील पाणी हे अजूनही राजापूरपर्यंतच पोहचलं आहे. एकंदर परिस्थिती पाहता हे पाणी पुढे अलमट्टी धरणात साठलं जात असते. त्या धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे, सूचना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

पिंपरी चिंचवडमध्ये कष्टकरी कामगार मेळाव्यास आले होते.  त्यानंतर जयंत पाटल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘सांगली पूर परिस्थितीवर आम्ही पूर्णत: लक्ष देत असून सुमारे १२०० कुटुंबाना स्थलांतरित करण्याचं काम करत आहोत. स्वत: मुख्यमंत्रीही प्रत्येक पूरस्थितीची माहिती घेत आहेत. वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत.

ज्या भागांमध्ये पूर आला आहे. त्या भागात मदतीची यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच एनडीआरएफची मदत पथकंही सज्ज आहे. कोणत्या भागात पाणी शिरेल, याचा अंदाज घेऊन त्या भागात अगोदरच मदत कार्य सुरू केलं आहे. कृष्णा नदीला पूर आलेला आहे. सकाळपासून पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पुराचे पाणी काही प्रमाणात कमी झालं आहे. जर अतिरिक्त पाऊस आणि जोर वाढल्यास नदीकाठच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्या त्या भागातील प्रशासन सज्ज ठेवले आहे. कोणत्याही भागात दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.’’

कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊसकोयना धरणात २४ तासांत १२ टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थपित झाला असून मागील ४८ तासांमध्ये १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. ७० टक्के धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे आणि त्याचप्रमाणे पाणी सोडले जात आहे. याचवेळी बचावकार्य सुरळीत सुरू आहे. 

महाबळेश्वरमध्ये ४८ तासांत १०७४.४ मिलीमीटर पाऊस गेल्या ४८ तासात १ हजार ७४ .४ मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये १४२ मिमी पाऊस पडला आहे. 

सांगलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJayant Patilजयंत पाटीलKarnatakकर्नाटकState Governmentराज्य सरकारRainपाऊसfloodपूर