शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा; जयंत पाटलांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:47 IST

राज्यातील पूरस्थितीची स्वत: मुख्यमंत्री माहिती घेत असून वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत: जलसंपदामंत्री जयंत पाटील

पिंपरी : सांगली, कोल्हापूर मधील पाणी हे अजूनही राजापूरपर्यंतच पोहचलं आहे. एकंदर परिस्थिती पाहता हे पाणी पुढे अलमट्टी धरणात साठलं जात असते. त्या धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे, सूचना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

पिंपरी चिंचवडमध्ये कष्टकरी कामगार मेळाव्यास आले होते.  त्यानंतर जयंत पाटल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘सांगली पूर परिस्थितीवर आम्ही पूर्णत: लक्ष देत असून सुमारे १२०० कुटुंबाना स्थलांतरित करण्याचं काम करत आहोत. स्वत: मुख्यमंत्रीही प्रत्येक पूरस्थितीची माहिती घेत आहेत. वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत.

ज्या भागांमध्ये पूर आला आहे. त्या भागात मदतीची यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच एनडीआरएफची मदत पथकंही सज्ज आहे. कोणत्या भागात पाणी शिरेल, याचा अंदाज घेऊन त्या भागात अगोदरच मदत कार्य सुरू केलं आहे. कृष्णा नदीला पूर आलेला आहे. सकाळपासून पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पुराचे पाणी काही प्रमाणात कमी झालं आहे. जर अतिरिक्त पाऊस आणि जोर वाढल्यास नदीकाठच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्या त्या भागातील प्रशासन सज्ज ठेवले आहे. कोणत्याही भागात दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.’’

कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊसकोयना धरणात २४ तासांत १२ टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थपित झाला असून मागील ४८ तासांमध्ये १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. ७० टक्के धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे आणि त्याचप्रमाणे पाणी सोडले जात आहे. याचवेळी बचावकार्य सुरळीत सुरू आहे. 

महाबळेश्वरमध्ये ४८ तासांत १०७४.४ मिलीमीटर पाऊस गेल्या ४८ तासात १ हजार ७४ .४ मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये १४२ मिमी पाऊस पडला आहे. 

सांगलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJayant Patilजयंत पाटीलKarnatakकर्नाटकState Governmentराज्य सरकारRainपाऊसfloodपूर