शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा; जयंत पाटलांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:47 IST

राज्यातील पूरस्थितीची स्वत: मुख्यमंत्री माहिती घेत असून वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत: जलसंपदामंत्री जयंत पाटील

पिंपरी : सांगली, कोल्हापूर मधील पाणी हे अजूनही राजापूरपर्यंतच पोहचलं आहे. एकंदर परिस्थिती पाहता हे पाणी पुढे अलमट्टी धरणात साठलं जात असते. त्या धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे, सूचना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

पिंपरी चिंचवडमध्ये कष्टकरी कामगार मेळाव्यास आले होते.  त्यानंतर जयंत पाटल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘सांगली पूर परिस्थितीवर आम्ही पूर्णत: लक्ष देत असून सुमारे १२०० कुटुंबाना स्थलांतरित करण्याचं काम करत आहोत. स्वत: मुख्यमंत्रीही प्रत्येक पूरस्थितीची माहिती घेत आहेत. वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत.

ज्या भागांमध्ये पूर आला आहे. त्या भागात मदतीची यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच एनडीआरएफची मदत पथकंही सज्ज आहे. कोणत्या भागात पाणी शिरेल, याचा अंदाज घेऊन त्या भागात अगोदरच मदत कार्य सुरू केलं आहे. कृष्णा नदीला पूर आलेला आहे. सकाळपासून पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पुराचे पाणी काही प्रमाणात कमी झालं आहे. जर अतिरिक्त पाऊस आणि जोर वाढल्यास नदीकाठच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्या त्या भागातील प्रशासन सज्ज ठेवले आहे. कोणत्याही भागात दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.’’

कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊसकोयना धरणात २४ तासांत १२ टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थपित झाला असून मागील ४८ तासांमध्ये १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. ७० टक्के धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे आणि त्याचप्रमाणे पाणी सोडले जात आहे. याचवेळी बचावकार्य सुरळीत सुरू आहे. 

महाबळेश्वरमध्ये ४८ तासांत १०७४.४ मिलीमीटर पाऊस गेल्या ४८ तासात १ हजार ७४ .४ मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये १४२ मिमी पाऊस पडला आहे. 

सांगलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJayant Patilजयंत पाटीलKarnatakकर्नाटकState Governmentराज्य सरकारRainपाऊसfloodपूर