शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिरायती गावातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यानी साधला संवाद पाणी, चारा टंचाई विषयी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:04 IST

 बारामती तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देचारा डेपोच्या मागणीचा विचार मंत्रालय बैठकीत करू : मुख्यमंत्र्याचे आश्वासन 

बारामतीबारामती तालुक्यातील जिरायती भागातील सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्स्द्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर काऱ्हाटी, साबळेवाडी, , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणाऱ्या प्रश्न  मांडले. यावेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेलजल योजना मंजुर झाली आहे. मात्र वनविभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्स् कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या प्रश्न लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सुचना केली. तसेच साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी  मुख्यमंत्र्यांकडे  केली. तर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी पंधरा दिवसात संपणार आहे. त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे, अशी मागणी केली. तसेच खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काऱ्हाटीचे सरपंच बबन जाधव  यांनी ‘चारा छावणी ऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘हा मंत्रालयस्तरावरचा विषय आहे. दोन दिवसात मंत्रालयामध्ये बैठक होईल. त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच काऱ्हाटीचे सरपंच जाधव यांनी ‘१ जुनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे अशी  मागणी केली. दरम्यान, यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. ---------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीsarpanchसरपंच