शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निधीअभावी कृषी विभागाचा परदेश दौरा रद्द करण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:57 IST

आता निकषही बदलले, वयाची, शिक्षणाची अट काढली

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध करून दिली जात असल्याने हा दौरा रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढविली आहे. कोरोनाचा काळ वगळता गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याचा लाभ घेता आलेला नाही. राज्यातील शेतकरी २०१९-२० या आर्थिक वर्षात इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या निवडीचे निकष कृषी विभागाने बदलले असून, शिक्षणाची, तसेच वयाची कमाल अट पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावा यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान शेतीत आणले जाते. त्यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून परदेशातील शेती तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांना पाहता यावे, यासाठी परदेश दौऱ्यांचे आयोजन केले जाते. यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, ही तरतूद उपलब्ध करून देताना आर्थिक वर्षाच्या शेवटी अर्थात मार्च महिन्यात उपलब्ध करून दिली जात असल्याने कृषी विभागाला या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठवता येणे अवघड झाले आहे. याच कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा दौरा ऐनवेळी रद्द करावा लागत आहे.

कृषी विभागाने २०२४-२५ या वर्षासाठी १६५ शेतकऱ्यांची निवड केली होती. आता ही निवड रद्द करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. या शेतकऱ्यांना अन्य नवीन शेतकऱ्यांप्रमाणे नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. राज्यात २०२३-२४ मध्ये मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने आर्थिक तरतूदच उपलब्ध करून दिली नाही. तर २०२४-२५ मध्ये दोन कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपैकी केवळ १ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूदही ३ मार्च रोजी उपलब्ध करून दिल्याने केवळ २७ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठविता येणे शक्य झाले नाही. परिणामी ही तरतूद राज्य सरकारकडे परत पाठवण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली.

दरम्यान कृषी विभागाने या परदेश दौऱ्याच्या निवडीचे २०२४-२५ मधील निकष बदलले आहेत. यापूर्वी शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा २५ ते ६० असावी, असे निकष होते. मात्र, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने हे निकष बदललेले असून आता किमान शिक्षणाची अट व कमाल ६० वर्षे ही वयाची अट रद्द करण्यात आली आहे. तर शेतकऱ्याचे किमान वय २५ असावे लागणार आहे. यामुळे जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेता येईल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांमध्ये शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार होते. आता २०२५-२६ या आर्थिक वर्षात युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना