पाटसच्या रसत्यावर घाणीचे साम्राज्य
By Admin | Updated: May 7, 2014 21:28 IST2014-05-07T20:35:34+5:302014-05-07T21:28:01+5:30
पाटस (ता. दौंड) येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाटसच्या रसत्यावर घाणीचे साम्राज्य
पाटस : पाटस (ता. दौंड) येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना करुन देखील याकडे डोळेझाक केली जाते, अशी परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. परिसरातील लोक याच ठिकाणी घाण आणून टाकतात. घाण टाकण्यासाठी कुंडीही ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे या भागातील व्यापारी आणि रहिवाशी दुर्गंधीला त्रस्त झाले आहेत. पाटस गावाला घंटागाडी दिलेली आहे. मात्र गावची आणि परिसरातील लोकसंख्या पाहता ही घंटागाडी सर्वच ठिकाणी पोहचू शकत नाही, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. पाटस गावात ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो. तो रोजच्या रोज उचलावा की, जेणेकरुन घाण साचणार नाही आणि दुर्गंधीही पसरणार नाही. मात्र तसे न होता. गावात काही ठिकाणी कचरा एकाच ठिकाणी साठून असल्याची वस्तुस्थिती आहे.
चौकट
आणि कचरा पेटवला
पाटस गावच्या मुख्य रस्त्यावर सातत्याने कचरा साचला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. दरम्यान काही व्यापार्यांनी हा कचरा केवळ सामाजिक बांधिलकीतून पेटवून दिल्यामुळे दुर्गंधी येणे थांबले होते. परंतु साचलेला कचरा कितीवेळा पेटवायचा आणि ग्रामपंचायतीचे कामकाज आम्ही तरी कशाला करायचे असाही संतप्त सवाल काही व्यापार्यांनी केला आहे.