शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पूर्वकल्पना न देता अचानक टाळेबंदी जाहीर करताना मोदींना काही वाटले नाही का? काँगेसचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:25 IST

संसदेतील सभागृहाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा अतीशय निंद्य प्रकार भाजपाने केला आहे

पुणे : देशाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक रात्री टाळेबंदी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही वाटले नाही का? रोजगार बंद, काम बंद असे असताना परप्रांतीय मजूरांना उपाशी मरू द्यायचे होते का असा संतप्त सवाल पुण्यातून काँग्रेसने केला आहे.

प्रदेश प्रवक्तेे गोपाळ तिवारी म्हणाले,  संसदेतील सभागृहाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा अतीशय निंद्य प्रकार भाजपाने केला आहे. देशाला कसलीही माहिती न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक टाळेबंदी जाहीर केली. सर्व चलनवलन थांबवले. अशा वेळी वास्तविक त्यांनी नागरिकांचा विचार करायला हवा होता. ते खातील काय याची काळजी घ्यायला हवी होती. ती महाराष्ट्र सरकारने घेतली. काँग्रेसने स्वखर्चाने मजूरांना तिकीटे काढून देत त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवले

मोदी सरकारने मात्र रेल्वेची तिकीटे याही काळात वाढवली. काँग्रेसने स्वखर्चाने या मजूरांना तिकीटे काढून देत त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवले. या काळात मोदीच कोरोना साथीवर प्र‌भावी उपाययोजना करायचे सोडून नागरिकांना टाळ्या व थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते अशी टीका तिवारी यांनी केली. काँग्रेसमुळे नाही तर मोदी सरकारने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांना भारतात बोलावून व विरोध होत असतानाही कूंभ मेळ्याला परवानगी देऊन देशात कोराना वाढवला असे तिवारी म्हणाले. देशाच्या संसदेत राजकीय भाषण करून महाराष्ट्राची व बिहार, उत्तरप्रदेशची बदनामी करणाऱ्या मोदी यांना या राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही असा इशाराही तिवारी यांनी दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारत