शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:34 IST

महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं

पुणे : महाविकासआघाडीचे सरकार एक महिन्यात पडेल, दोन महिन्यात पडेल हे सर्व केल्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीस यांना झाला आहे. देवेंद्र फडणविसांच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या दावणीला बांधला. मुंबईसारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीसांना व्हायला हवा. याउलट महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं, अशा शब्दात काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते.

मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार

''राज्यात जेव्हा आघाडी सरकार होते. तेव्हा देखील आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. यात नवीन काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा विषय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडतो. मुंबईत एकटे लढण्याचा निर्णय हा स्थानिक नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमची ही भूमिका राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कळवलेली आहे. आमच्या या निर्णयामुळे महाविकासआघाडी बिघाडी होणार असे काही नाही.

पुण्यावर बोलणं म्हणजे..

''पुणे महानगरपालिका देखील मुंबईप्रमाणेच एकटे लढणार का असे विचारले असता भाई जगताप म्हणाले, पुण्यावर काहीतरी बोलणे म्हणजे बाप रे बाप..तुम्हीच पुण्याविषयी काहीतरी सांगा आणि माझ्या ज्ञानात अधिक भर टाका, असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगताप