शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

"देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:13 IST

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र, राज्यातील बहुतांशी जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असून या उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे, सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात गाठीभेटी, गावदौरे करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका गावदौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. 

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अजित पवार यांच्या विरोधातही महायुतीतील काही नेते मैदानात उतरले आहेत. दौंड मतदारसंघातून विजय शिवतारे तर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मात्र, महायुतीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होणार आहेत. त्याच अनुषंगाने सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बारामतीमध्ये स्वागत असल्याचे म्हटले. 

तुम्हाला हरवणं हाच नेतेमंडळींचा उद्देश आहे. पण, त्यांच्यातही मतभेद आहेत. याच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस हेही बारामतीत येणार आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, अतिथी देवो भवं... म्हणत त्यांचं बारामतीमध्ये स्वागतच आहे, असे खा. सुप्रिया सुळेंनी म्हटले. 

माझी त्यांच्याकडून एकच माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे, त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून टाकावा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तसेच, दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढावा, एखाद दोन नोकरीचे मोठे प्रकल्प येथे आणावेत, सिलेंडरचा भाव कमी करावा, आम्हाला हमी भाव त्यांनी द्यावा, दिल्लीला एकदा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावं, अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी फडणवीसांकडून व्यक्त केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचं स्पष्ट केलं. महादेव जानकर महायुतीत आले असले तरी बारामतीत तुमच्याच मनातील उमेदवार दिला जाईल, असेही अजित पवारांनी म्हटलं. त्यामुळे, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजाय असाच राजकीय सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMumbaiमुंबईAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस