शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 19:02 IST

देवेंद्र फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

बावनकुळे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही. फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत. ते कधीच असत्य विधान करत नाहीत. ते त्यांच्या रक्तात नाही. जे घडलं आहे तेच फडणवीस बोलत असतात. पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली. राज ठाकरे यांनी प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे. 

शहा यांचा दौरा नियोजित

कसब्याचं आम्हाला आव्हान नसून आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असतो. कसब्यात केंद्रीय पातळीवरून कुणीही प्रचारासाठी येणार नाही. राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी येतील. अमित शहा यांचा दौरा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. शाह यांचा दौरा नियोजित होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरें यांच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असच म्हटलं गेलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं आहे. सूड भावनेने कधी काम केलं नाही पण फडणवीस यांचा विश्वासघात केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

भीमाशंकर बाबत काय दावा करायचा तो करू द्या, आपली श्रद्धास्थान कायम

आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर या देवस्थानावर दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आसाम सरकारला काय दावा करायचा तो करूद्या. मात्र आपली श्रद्धास्थान कायम राहणार आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.ज्या विरोधकांनी उद्योगांसाठी एकही बैठक घेतली नाही. ते आता उद्योग गेला म्हणत आहेत. फक्त बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. पण एकही पेपर दाखवू शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार