शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:07 IST

पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता....

पुणे :पुणेकर सर्वांत जास्त पाणी वापरतात, अशी तक्रार महाराष्ट्राची आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. तरीदेखील पुणेकरांना पाण्याची टंचाई जाणवते. लवकरच २४ तास पाण्याची योजना सुरू होईल. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल. धरणातील पाणी वाचेल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांना एका पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता ‘तुम्ही खूप पाणी वापरता’ असे बोलून पुणेकरांवर निशाणा साधला, तसेच विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

प्रश्न : पुण्यात पाण्याची टंचाई?

- पुणेकरांसाठी २४ तास पाणी योजना लवकरच सुरू होईल. त्यामुळे कुठे टंचाई जाणवणार नाही, तसेच एमआयडीसीचे प्रदूषित पाणी नदीत जाते. त्यावर प्रक्रिया करून तेच वापरण्यासाठी सांगणार आहोत. त्यातून नदी प्रदूषित होणार नाही आणि पाण्याचा पुनर्वापरही होईल.

वाहतूक कोंडी प्रचंड, रस्ते मोठे करा?

- नगर रस्ता, नाशिककडे जाणारा रस्ता येथे वाहतूक कोंडी होते. काही ठिकाणी आम्ही इलिव्हेटेड रस्ते करत आहोत. त्याने कोंडी फुटेल. दीड- दोन वर्षांनंतर हा त्रास होणार नाही. पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेचे कामही सुरू होईल.

पुण्यात आयआयटी किंवा आयआयएम का नाही?

- पुण्यातील शैक्षणिक संस्था आयआयटी, आयआयएमपेक्षाही उत्कृष्ट काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटीची संख्या वाढवली आहे; पण सर्वत्र त्या करता येत नाहीत. पुण्यात खूप शैक्षणिक संस्था असून, त्यांच्यात जागतिक स्तरावरील शिक्षणातील एक्सलन्स आहे. म्हणून इथे आयआयटी, आयआयएमची गरजच नाही.

महिला उद्योजकांसाठी रोजगार योजना काय?

- देशातील अनेक मोठ्या महिला उद्योजिका या पुण्यातून वर आलेल्या आहेत. पुण्याचे हे मोठे योगदान आहे. त्यामुळे अजून महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण किंवा योजना करायची असेल, तर नक्कीच करू.

पुण्यात विजेचा तुटवडा?

- शेतीची वीज सौरऊर्जेवर नेण्यासाठी प्रयत्न करतोय. कृषीचे ४ हजार मेगावॅट फिडर यावर आणणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध होईल, ती उद्योगाला देऊ.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणीPuneपुणे