शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणानंतरही शेतकऱ्यांना पाणी नाहीच, ५० किलोमीटरचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:20 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील जवळजवळ ५० किलोमीटर नदीचे पात्र कोरडे पडल्याने थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून मृगजळाच्या झळा सहन करण्याची वेळ येथील शेतक-यांवर आलेली आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.नीरा नदीचे पाणी हे तीन जिल्ह्यातील शेतक-यांना वरदान ठरलेले असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली आहे. चार वर्षे सतत पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोरडी ठणठणीत पडल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेली होती. यावर्षी योग्य वेळी मुबलक पाऊस धरणक्षेत्रात होऊनही नदीच्या पात्रात थेंबही पाणी नसल्याने पुन्हा एकदा शेतकºयांना पाण्यासाठी पायपीठ करण्याची वेळ आलेली आहे. या परिसरातील शेतकºयांना निरा डाव्या कालाव्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी भटकंती शिवाय पर्याय नाही. नदीच्या पाण्याच्या विश्वासावर शेतकºयाने जनावरासाठी चारा पिके घेण्यात आलेले आहेत.परंतु, पाणीच नसल्याने जागेवर पिके वाळून गेलेली आहेत. चिखली, कुरवली, कळंब, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, पिठेवाडी, सराटी, बावडा नीरानृसिंहपूरपर्यंत जवळजवळ ५० किलोमीटरचा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणी मिळण्यासाठी येथील शेतकºयाने नदीच्या पात्रात ७ दिवस उपोषण केले. अनेक लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेटी घेतले. उपोषणकर्त्यांची परिस्थिती बाहेर गेल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मुंबईला येथील शिष्यमंडळ पाणी सोडण्यात यावे म्हणून जलसंपदा मंत्री पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले. परंतु या शेतकºयाची व्यथा कोणत्याही शासकीय अधिका-यांनी समजून घेतलेले नाही. मोकळ्या हाताने शेतकरी पुन्हा वैशाख वणव्यातील झळा सोसत आहेत.शासन दरबारी येथील शेतक-यांना काळ्या पाण्याची शिक्षाच ठोठावलेले असल्याचे येथील शेतकºयांतून बोलले जात आहे. शेतकºयाचे हित लक्षात घेऊन शासनाने गांभीर्याने विचार करून जनारांना पिण्यासाठी चारा पाण्याचा विचार करून पाणी सोडण्यात यावे अशी, आर्त हाक येथील शेतकरी मारत आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी