शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उपोषणानंतरही शेतकऱ्यांना पाणी नाहीच, ५० किलोमीटरचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:20 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील जवळजवळ ५० किलोमीटर नदीचे पात्र कोरडे पडल्याने थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून मृगजळाच्या झळा सहन करण्याची वेळ येथील शेतक-यांवर आलेली आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.नीरा नदीचे पाणी हे तीन जिल्ह्यातील शेतक-यांना वरदान ठरलेले असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली आहे. चार वर्षे सतत पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोरडी ठणठणीत पडल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेली होती. यावर्षी योग्य वेळी मुबलक पाऊस धरणक्षेत्रात होऊनही नदीच्या पात्रात थेंबही पाणी नसल्याने पुन्हा एकदा शेतकºयांना पाण्यासाठी पायपीठ करण्याची वेळ आलेली आहे. या परिसरातील शेतकºयांना निरा डाव्या कालाव्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी भटकंती शिवाय पर्याय नाही. नदीच्या पाण्याच्या विश्वासावर शेतकºयाने जनावरासाठी चारा पिके घेण्यात आलेले आहेत.परंतु, पाणीच नसल्याने जागेवर पिके वाळून गेलेली आहेत. चिखली, कुरवली, कळंब, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, पिठेवाडी, सराटी, बावडा नीरानृसिंहपूरपर्यंत जवळजवळ ५० किलोमीटरचा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणी मिळण्यासाठी येथील शेतकºयाने नदीच्या पात्रात ७ दिवस उपोषण केले. अनेक लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेटी घेतले. उपोषणकर्त्यांची परिस्थिती बाहेर गेल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मुंबईला येथील शिष्यमंडळ पाणी सोडण्यात यावे म्हणून जलसंपदा मंत्री पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले. परंतु या शेतकºयाची व्यथा कोणत्याही शासकीय अधिका-यांनी समजून घेतलेले नाही. मोकळ्या हाताने शेतकरी पुन्हा वैशाख वणव्यातील झळा सोसत आहेत.शासन दरबारी येथील शेतक-यांना काळ्या पाण्याची शिक्षाच ठोठावलेले असल्याचे येथील शेतकºयांतून बोलले जात आहे. शेतकºयाचे हित लक्षात घेऊन शासनाने गांभीर्याने विचार करून जनारांना पिण्यासाठी चारा पाण्याचा विचार करून पाणी सोडण्यात यावे अशी, आर्त हाक येथील शेतकरी मारत आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी