शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उपोषणानंतरही शेतकऱ्यांना पाणी नाहीच, ५० किलोमीटरचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:20 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील जवळजवळ ५० किलोमीटर नदीचे पात्र कोरडे पडल्याने थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून मृगजळाच्या झळा सहन करण्याची वेळ येथील शेतक-यांवर आलेली आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.नीरा नदीचे पाणी हे तीन जिल्ह्यातील शेतक-यांना वरदान ठरलेले असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली आहे. चार वर्षे सतत पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोरडी ठणठणीत पडल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेली होती. यावर्षी योग्य वेळी मुबलक पाऊस धरणक्षेत्रात होऊनही नदीच्या पात्रात थेंबही पाणी नसल्याने पुन्हा एकदा शेतकºयांना पाण्यासाठी पायपीठ करण्याची वेळ आलेली आहे. या परिसरातील शेतकºयांना निरा डाव्या कालाव्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी भटकंती शिवाय पर्याय नाही. नदीच्या पाण्याच्या विश्वासावर शेतकºयाने जनावरासाठी चारा पिके घेण्यात आलेले आहेत.परंतु, पाणीच नसल्याने जागेवर पिके वाळून गेलेली आहेत. चिखली, कुरवली, कळंब, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, पिठेवाडी, सराटी, बावडा नीरानृसिंहपूरपर्यंत जवळजवळ ५० किलोमीटरचा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणी मिळण्यासाठी येथील शेतकºयाने नदीच्या पात्रात ७ दिवस उपोषण केले. अनेक लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेटी घेतले. उपोषणकर्त्यांची परिस्थिती बाहेर गेल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मुंबईला येथील शिष्यमंडळ पाणी सोडण्यात यावे म्हणून जलसंपदा मंत्री पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले. परंतु या शेतकºयाची व्यथा कोणत्याही शासकीय अधिका-यांनी समजून घेतलेले नाही. मोकळ्या हाताने शेतकरी पुन्हा वैशाख वणव्यातील झळा सोसत आहेत.शासन दरबारी येथील शेतक-यांना काळ्या पाण्याची शिक्षाच ठोठावलेले असल्याचे येथील शेतकºयांतून बोलले जात आहे. शेतकºयाचे हित लक्षात घेऊन शासनाने गांभीर्याने विचार करून जनारांना पिण्यासाठी चारा पाण्याचा विचार करून पाणी सोडण्यात यावे अशी, आर्त हाक येथील शेतकरी मारत आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी