शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोरोना काळात कर्तव्य पार पाडूनही मानधनापासून वंचित; जिल्हा परिषदेवर आशा सेविकांचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 17:46 IST

कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता सेविकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र, शासनाने कदर न करता त्रोटक मानधन दिले..

ठळक मुद्देविविध मागण्यांचे दिले निवेदन

पुणे : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता थेट घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविका हक्काच्या मानधनापासून वंचित राहिल्या आहेत. त्यात शासनाने पुन्हा क्षयरूग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याने आशा सेविकांनी रौद्ररूप धारण करत शुक्रवारी थेट जिल्हा परिषदेवर धडकल्या. वाढीव मानधनाबरोबर अन्य मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सर्वेक्षण करणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारत लवकर त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांवर आहे. मात्र, त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जाताे. जो मोबदला मिळतो तोडका असल्यानेने तो जादा मिळावा. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सेविकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र, शासनाने कदर न करता त्रोटक मानधन दिले. आरोग्य केंद्रात मिळणारी वागणूक अपमान जनक असल्याने, तसेच सहनशिलतेचा अंत झाल्याने आशा सेविकांनी आपल्हा हक्कासाठी एल्गार पुकारत थेट जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वाढीव मानधन काढतांना ते सरसकट २ हजार ते ३ हजार रूपये द्यावे, गटप्रवर्तक व आशा सेविकांना अतिरिक्त बैठकांसाठी मानधन द्यावे, ते पूर्ण वर्षाचे काढावे, गटप्रवर्तकांना शारदाग्राम आणि एच.बी.एन.सी मानधन द्यावे या सारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारत लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात महाराष्ट्र आशा-गट प्रवर्तक वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा स्वाती धअयगुडे, सरचिटणीस श्रीमंत घोडके, सीमा, मालुसरे आदी उपस्थित होते.

---तर सर्वेक्षण करणार नाहीआशा सेविकांना मिळणारी वागणूक चुकीची आहे. मानधन कमी असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या तुलनेत कामे जास्त असतात. यामुळे रोज १५० रूपये अनुदान मिळत असेल तरच आम्ही सर्वेक्षण करू, अन्यथा सर्व सर्वेक्षणातून माघार घेऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली....... 

जिल्ह्यातील आरोग्याची जबाबदारी आशा सेविकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कोरोना काळात केलेले काम कौतूकास्पद आहे. त्यांच्या मागण्या या शासन दरबारी पाठवून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या