शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

गोहे तलावाने गाठला तळ, डिंभे धरणातून पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:18 IST

गोहे पाझर तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. तलवात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, तलावातील गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे.

डिंभे - गोहे पाझर तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. तलवात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, तलावातील गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे. या तलावात डिंभे धरणातून पाणी सोडण्यात यावे ही या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, अद्यापही शेतकºयांच्या या मागणीला यश आले नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील गोहे, मापोली, उपळवाडी, दांगटवाडी, विठ्ठलवाडी, हरीचा अंबा, संगमवाडी हा परिसर एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होेता. परंतु, या ठिकाणी गोहे पाझर तलाव झाल्यापासून या भागाचा चेहरामोहराच बदलून गेला. दुष्काळी भागाचे रूपांतर हरितक्रांतीत होऊन येथील आदिवासी शेतकºयांना सुखाचे दिवस पाहावयास मिळाले आहेत.यंदा या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला; मात्र परतीच्या पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने, या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.तलावाच्या निर्मितीपासून या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या तलावाची पाणी साठवण क्षमाता अतिशय कमी झाली आहे. तलावाचा पसाराजरी मोठा वाटत असला, तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून या तलावात पाणी अतिशय कमी साठतअसल्याचे पाहावयास मिळते.त्यातच या परिसरात बागायतीपिके घेण्याचे प्रमाणही वाढल्याने पर्यायाने पाणीउपसा देखीलवाढला आहे.सध्या या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. तलावाची खोली कमी झाल्याने व सततच्या उपश्यामुळे या तलावातील पाणी यंदा लवकरच दूषित होण्याची चिन्हे आहेत. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते. यामुळे पावसाळ्यात तलावात साठलेले पाणी अतिशय झपाट्याने कमी होत असते.डिंभे धरणातून या तलावात पाणी सोडण्याची या भागातील शेतकºयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबरोबरच या तलावाची गळती थांबवून खोली वाढविण्याची मागणी या भागातील शेतकºयांकडून करण्यात येत आहे. मात्र, वर्षामागून वर्षे उलटून जात असूनही आदिवासी शेतकºयांच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणे