शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी; 'अशी' झाली अपहरणकर्त्या मुलाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 12:18 AM

बारामती तालुक्यातील घटना

बारामती : व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी करीत पाहुणेवाडी(ता.बारामती)येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.मात्र, अपहरण झालेल्या युवकाला पोलीसांच्या भीतीने मोरगाव नजिक  अपहरणकर्त्यांनी  दुसºया दिवशी सोडुन दिले आहे. अपहरण झालेला युवक सुखरुप असुन त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

 बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसारमी अनमोल लालासाहेब परकाळे (वय २७, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २८ ) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास सुरुवात झाली.  कुत्रेबाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेला होता.यावेळी काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणूनद्या . पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच संबंधित अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना भरला.

त्यानंतर रात्री १०.१२ नंतर पुन्हा १०.१६ वाजेदरम्यान लालासाहेब यांना परत त्याचा फोन आला. त्यावेळी तो मला म्हणाला की,तुमचा फोन व्यस्त लागतोय तुम्ही कोणाशी चर्चा केली काय, तुम्ही पोलिसांना फोन लावता काय जर तुम्ही त्यांना फोन केला तर तुमच्या मुलाला विसरा, असा दम दिला. त्यावेळी लालासाहेब यांच्या पत्नी अनिता यांनी फोन घेवून मुलाकडे कसले पैसे आहेत,अशी विचारणा केली.त्यावर आमचा व्याजाचा व्यवसाय असुन तुमच्या मुलाने माझ्याकडुन पंधरा लाख रुपये व्याजाने घेतले आहे ते व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी ३ वाचे पर्यंत द्यायचे, नाहीतर तुमचा मुलगा तुम्ही विसरा असे म्हणुन फोन बंद केला.आमच्या मुलाचे बरे वाईट होईल  या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही.

 रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा देण्यात आला.तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. का-हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप फोनवर अपहरणकर्त्यांनी दिला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत. काय,मात्र, पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच फोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्याजवळ अपहरणकर्त्यांनी सोडले आहे. यावेळी अनमोल याने वडिलांना एक वॅगनर या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी पाच जणांनी जबरदस्तीने बसवुन अपहरण केल्याचे सांगितले. दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. करुन पैश्याची मागणी केली. माझी वरील अनोळखी पाच इसमांविरुध्द तक्रार आहे.————————————————...पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात  लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नव्हते.मात्र, या अपहरणनाट्याची  माहिती समजल्याने पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. अनमोल सुखरुप परत आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी या पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीKidnappingअपहरणPoliceपोलिस