शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान, नुकसानभरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:43 IST

अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

भोर  - भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाउस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भातपिक पावसात भिजले असून शेतक-यांचे ३० ते ३५ टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पिक असुन ७४०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पश्चिम भागातील हिर्डोशी, आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खोºयात मागील १५ दिवसांपासून भात काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी तुंबून राहिले. शेतात कापून ठेवलेले तसेच खळयावर आणुन झोडणी सुरु असलेले भात पीक पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. भातपिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे भाताचे पिक चांगले होते. मात्र शेवटचे दोन पाऊस मिळाले नाही. परिणामी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे उत्पादन घटले होते. उरले सुरले पीक दिवाळीच्या अगोदर काढावे म्हणून शेतकरी भात कापणी व झोडणीच्या घाईत होता. मात्र पुन्हा या सततच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रायरी, साळव, कंकवाडी, करंजगाव, म्हसर बु .म्हसर खुर्द, निगुडघर, आपटी, कारी, भावेखल, अंगसुळे, पºहर, गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली खुर्द व बु,दुर्गाडी अभेपुरी, शिळींब, शिरगाव, हिर्डोशी, वारवंड, देवघर, वेनुपुरी, कोंढरी आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खो-यातील पिक मोठया प्रमाणात खराब झाले आहे. आतापर्यंत ५० टक्के भाताची कापणी झाली असुन सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.पाऊस नसल्याने पिकात दाणा भरला नाहीहळव्या जातीच्या भातात पळंज निर्माण झाले. दुसरीकडे गरव्या जातीच्या भातपीक काढणी सुरु असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे पिक काळे पडले आहे. पिकावर बुरशी वाढली उत्पादनात मोठी घट होणार आहे. भोर तालुक्यालादुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याने कशा प्रकारे नुकसानभरपाई देणार की शेतकºयांना वाºयावर सोडणार? अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे