शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान, नुकसानभरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:43 IST

अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

भोर  - भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाउस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भातपिक पावसात भिजले असून शेतक-यांचे ३० ते ३५ टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पिक असुन ७४०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पश्चिम भागातील हिर्डोशी, आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खोºयात मागील १५ दिवसांपासून भात काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी तुंबून राहिले. शेतात कापून ठेवलेले तसेच खळयावर आणुन झोडणी सुरु असलेले भात पीक पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. भातपिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे भाताचे पिक चांगले होते. मात्र शेवटचे दोन पाऊस मिळाले नाही. परिणामी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे उत्पादन घटले होते. उरले सुरले पीक दिवाळीच्या अगोदर काढावे म्हणून शेतकरी भात कापणी व झोडणीच्या घाईत होता. मात्र पुन्हा या सततच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रायरी, साळव, कंकवाडी, करंजगाव, म्हसर बु .म्हसर खुर्द, निगुडघर, आपटी, कारी, भावेखल, अंगसुळे, पºहर, गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली खुर्द व बु,दुर्गाडी अभेपुरी, शिळींब, शिरगाव, हिर्डोशी, वारवंड, देवघर, वेनुपुरी, कोंढरी आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खो-यातील पिक मोठया प्रमाणात खराब झाले आहे. आतापर्यंत ५० टक्के भाताची कापणी झाली असुन सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.पाऊस नसल्याने पिकात दाणा भरला नाहीहळव्या जातीच्या भातात पळंज निर्माण झाले. दुसरीकडे गरव्या जातीच्या भातपीक काढणी सुरु असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे पिक काळे पडले आहे. पिकावर बुरशी वाढली उत्पादनात मोठी घट होणार आहे. भोर तालुक्यालादुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याने कशा प्रकारे नुकसानभरपाई देणार की शेतकºयांना वाºयावर सोडणार? अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे