शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान, नुकसानभरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:43 IST

अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

भोर  - भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाउस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भातपिक पावसात भिजले असून शेतक-यांचे ३० ते ३५ टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पिक असुन ७४०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पश्चिम भागातील हिर्डोशी, आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खोºयात मागील १५ दिवसांपासून भात काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी तुंबून राहिले. शेतात कापून ठेवलेले तसेच खळयावर आणुन झोडणी सुरु असलेले भात पीक पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. भातपिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे भाताचे पिक चांगले होते. मात्र शेवटचे दोन पाऊस मिळाले नाही. परिणामी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे उत्पादन घटले होते. उरले सुरले पीक दिवाळीच्या अगोदर काढावे म्हणून शेतकरी भात कापणी व झोडणीच्या घाईत होता. मात्र पुन्हा या सततच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रायरी, साळव, कंकवाडी, करंजगाव, म्हसर बु .म्हसर खुर्द, निगुडघर, आपटी, कारी, भावेखल, अंगसुळे, पºहर, गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली खुर्द व बु,दुर्गाडी अभेपुरी, शिळींब, शिरगाव, हिर्डोशी, वारवंड, देवघर, वेनुपुरी, कोंढरी आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खो-यातील पिक मोठया प्रमाणात खराब झाले आहे. आतापर्यंत ५० टक्के भाताची कापणी झाली असुन सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.पाऊस नसल्याने पिकात दाणा भरला नाहीहळव्या जातीच्या भातात पळंज निर्माण झाले. दुसरीकडे गरव्या जातीच्या भातपीक काढणी सुरु असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे पिक काळे पडले आहे. पिकावर बुरशी वाढली उत्पादनात मोठी घट होणार आहे. भोर तालुक्यालादुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याने कशा प्रकारे नुकसानभरपाई देणार की शेतकºयांना वाºयावर सोडणार? अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे