शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:07 IST

शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले....

पुणे : बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघावरही सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ, त्यातच उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात केलेला प्रवेश कार्यकर्त्यांना रुचला नाही. शिवाय शरद पवारांना मिळालेली सहानुभूती यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा शिरूरचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले होते. मतदारसंघामध्ये जनसंपर्कही वाढवला. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे उमेदवारीसाठी आढळराव-पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांच्याबरोबर मूळ शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे गटातच राहिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतही फूट पडली. आणि अजित पवार महायुतीत सामील झाले. जागावाटपावेळी अजित पवार यांनी शिरूरच्या जागेवर दावा सांगितल्याने आढळराव-पाटील यांची मोठी गोची झाली होती.

अखेर तडजोडीअंती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. या पक्षांतरामुळे कार्यकर्ते नाराज झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आढळरावांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाच पण भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनाही हे निर्णय रुचले गेले नाही. आमदार मोहिते-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे सख्ख सर्वांना माहीत आहे. सुरुवातीला मोहितेंनी केलेल्या विरोधामुळे कार्यकर्तेही चार्ज झाले होते. पण कालांतराने मोहिते-आढळराव यांच्यात दिलजमाई झाली पण कार्यकर्ते मात्र, तिथेच राहिले. त्याचा फटकाही आढळराव-पाटील यांना बसला.

दुसरीकडे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही सुरुवातीला आढळराव पाटील यांना साथ दिली. दरम्यान, त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते रुग्णालयात गेले. निवडणुकीपासून ते दूर झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या खऱ्या पण कार्यकर्त्यांनी काही फारसे मनावर घेतले नसल्याचे दिसले. वळसे-पाटील यांचे कट्टर समर्थकही अमोल कोल्हे यांचा प्रचार करताना दिसत होते. एकूणच नेते मंडळी जरी आढळरावांच्या दिमतीला दिसत होती तरी कार्यकर्ते मात्र, कोल्हेंच्या बाजूने दिसले.

शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हे यांना कसे निवडून येतो बघतोच असे आव्हान दिले होते. हेदेखील शिरूरमधील जनतेला रुचले नाही. याशिवाय खेड, जुन्नर, आंबेगाव सुजलाम् सुफलाम् करण्यामागे शरद पवार यांची मोठी पराकाष्टा आहे. त्यामुळे येथील अनेक मंडळी शरद पवारांच्या संपर्कात होती. पक्षफुटीनंतर या भागात शरद पवार यांनी पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्याने मोट बांधली. त्याला काँग्रेससह, उद्धव ठाकरे गट व अन्य घटक पक्षांची साथ मिळाली. शरद पवारांना जनतेत असलेली सहानुभूती तसेच घटक पक्षांनी पाळलेला आघाडी धर्म या सर्वांचा फायदा मिळाल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठे मताधिक्य खेचून आणले.

टॅग्स :shirur-pcशिरूरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४