शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:07 IST

शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले....

पुणे : बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघावरही सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ, त्यातच उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात केलेला प्रवेश कार्यकर्त्यांना रुचला नाही. शिवाय शरद पवारांना मिळालेली सहानुभूती यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा शिरूरचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले होते. मतदारसंघामध्ये जनसंपर्कही वाढवला. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे उमेदवारीसाठी आढळराव-पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांच्याबरोबर मूळ शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे गटातच राहिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतही फूट पडली. आणि अजित पवार महायुतीत सामील झाले. जागावाटपावेळी अजित पवार यांनी शिरूरच्या जागेवर दावा सांगितल्याने आढळराव-पाटील यांची मोठी गोची झाली होती.

अखेर तडजोडीअंती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. या पक्षांतरामुळे कार्यकर्ते नाराज झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आढळरावांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाच पण भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनाही हे निर्णय रुचले गेले नाही. आमदार मोहिते-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे सख्ख सर्वांना माहीत आहे. सुरुवातीला मोहितेंनी केलेल्या विरोधामुळे कार्यकर्तेही चार्ज झाले होते. पण कालांतराने मोहिते-आढळराव यांच्यात दिलजमाई झाली पण कार्यकर्ते मात्र, तिथेच राहिले. त्याचा फटकाही आढळराव-पाटील यांना बसला.

दुसरीकडे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही सुरुवातीला आढळराव पाटील यांना साथ दिली. दरम्यान, त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते रुग्णालयात गेले. निवडणुकीपासून ते दूर झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या खऱ्या पण कार्यकर्त्यांनी काही फारसे मनावर घेतले नसल्याचे दिसले. वळसे-पाटील यांचे कट्टर समर्थकही अमोल कोल्हे यांचा प्रचार करताना दिसत होते. एकूणच नेते मंडळी जरी आढळरावांच्या दिमतीला दिसत होती तरी कार्यकर्ते मात्र, कोल्हेंच्या बाजूने दिसले.

शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हे यांना कसे निवडून येतो बघतोच असे आव्हान दिले होते. हेदेखील शिरूरमधील जनतेला रुचले नाही. याशिवाय खेड, जुन्नर, आंबेगाव सुजलाम् सुफलाम् करण्यामागे शरद पवार यांची मोठी पराकाष्टा आहे. त्यामुळे येथील अनेक मंडळी शरद पवारांच्या संपर्कात होती. पक्षफुटीनंतर या भागात शरद पवार यांनी पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्याने मोट बांधली. त्याला काँग्रेससह, उद्धव ठाकरे गट व अन्य घटक पक्षांची साथ मिळाली. शरद पवारांना जनतेत असलेली सहानुभूती तसेच घटक पक्षांनी पाळलेला आघाडी धर्म या सर्वांचा फायदा मिळाल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठे मताधिक्य खेचून आणले.

टॅग्स :shirur-pcशिरूरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४