शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:09 IST

जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

पिंपरी : तथागत गौतम बुद्ध यांनी क्षमा, शांती, त्याग आणि सेवा-समर्पणाचा संदेश दिला. महाराष्ट्राला गौतम बुद्धांच्या या शिकवणीची गरज आहे. साधू-संतांचे विचार सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक असताना आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे, अंतर पाडण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. मात्र, हे प्रयत्न जनतेनेच हाणून पाडायला हवेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी च-होलीत केले.

च-होली-वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) उभारलेल्या प्रशिक्षण संकुलातील कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, रामेतीचे प्राचार्य विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'राज्यातील कायदा-सुव्यवस्था राहण्याकरिता मुख्यमंत्री, गृहमंत्री मनापासून प्रयत्न करीत आहेत. अधिकारी वर्गाची त्यांना साथ लाभते. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. कृषी विभागाला सन २०२२-२०२३ मध्ये ३ हजार ३५ कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. कृषी आणि संलग्न संस्थांसाठी २३ हजार ८८८ कोटींची तरतूद केली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांसोबतच कृषी संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देऊन कृषी विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

त्यातून हिंगोली येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधनाकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय चांगली घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरी