शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:09 IST

जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

पिंपरी : तथागत गौतम बुद्ध यांनी क्षमा, शांती, त्याग आणि सेवा-समर्पणाचा संदेश दिला. महाराष्ट्राला गौतम बुद्धांच्या या शिकवणीची गरज आहे. साधू-संतांचे विचार सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक असताना आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे, अंतर पाडण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. मात्र, हे प्रयत्न जनतेनेच हाणून पाडायला हवेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी च-होलीत केले.

च-होली-वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) उभारलेल्या प्रशिक्षण संकुलातील कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, रामेतीचे प्राचार्य विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'राज्यातील कायदा-सुव्यवस्था राहण्याकरिता मुख्यमंत्री, गृहमंत्री मनापासून प्रयत्न करीत आहेत. अधिकारी वर्गाची त्यांना साथ लाभते. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. कृषी विभागाला सन २०२२-२०२३ मध्ये ३ हजार ३५ कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. कृषी आणि संलग्न संस्थांसाठी २३ हजार ८८८ कोटींची तरतूद केली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांसोबतच कृषी संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देऊन कृषी विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

त्यातून हिंगोली येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधनाकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय चांगली घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरी