शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पुुरंदर विमानतळावर लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:55 IST

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली.

ठळक मुद्देराज्य शासन घेणार बैठक : प्रस्तावित कामांचा घेतला जाणार आढावा

पुणे : केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीत पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुढीत दोन ते तीन दिवसांत सिन्हा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्य शासनाबरोबर लवकरच बैठक घेऊन विमानतळाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी या बैठकीत उपस्थित होते. त्यात  विमानतळाच्या प्रस्तावित जागेसाठी सध्या अस्तित्वात असणारे जोडरस्ते, प्रस्तावित रिंगरोड तसेच रेल्वे आणि मेट्रो यांची विमानतळास जोडणी आदी विषयांवर चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

...................................

पुण्याच्या विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने विविध कामांच्या पाठपुरावा केला जातो. पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना केली होती. त्यावर सिन्हा यांनी मंगळवारी विमानतळाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर राज्य शासनाबरोबर एक बैठक होईल. त्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल.  अनिल शिरोळे, खासदार

..........................भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा.  विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रमात आहेत. त्यामुळे अलीकडेच त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकºयांना भेटून चर्चा व्हायला हव्यात.  सुप्रिया सुळे, खासदार 

टॅग्स :Purandarपुरंदरanil shiroleअनिल शिरोळेSupriya Suleसुप्रिया सुळेJayant Sinhaजयंत सिन्हा