शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अंत्यविधी करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , दोन जणांचा मृत्यू; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:10 IST

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कारने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना धुमाळ कुटुंबियांची गाडी पालखी तळाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकली.

नीरा ( पुरंदर )  : डिस्कळ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन माघारी येताना कारने ओढ्याच्या कठड्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जण मृत्यूमुखी पडले. हा अपघात फलटण-लोणंद रस्त्यावर पालखी तळाजवळील भोवर ओढ्याच्या पुलावर पहाटे दोनच्या सुमारास झाला. मृत व्यक्ती नीरा व जेऊर येथील आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

    गाडीचे चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३, रा. मांडकी ता. पुरंदर) व शोभा नंदकुमार धुमाळ (४५, सध्या नीरा मूळ रा. पाडेगाव ता. फलटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, धुमाळ कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कार (एमएच-१२. एचझेड. ७७२७) ने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना त्यांची गाडी पालखी तळाजवळील कठड्याला धडकली. यामध्ये चालक संजय धुमाळ व शोभा धुमाळ हे ठार झाले. तर सारिका संजय धुमाळ,कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय धुमाळ हे पुरंदर नागरी पतसंस्थेच्या नीरा शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. 

टॅग्स :PurandarपुरंदरAccidentअपघातDeathमृत्यू