शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 19:34 IST

तोल जाऊन पाण्यात पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने घेतली उडी

ठळक मुद्देखडकवासला कॅनॉल येथील घटना; पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहत गेला मृतदेह 

पुणे : खडकवासला येथील कालव्यात सकाळी नऊच्या सुमारास कैलास चव्हाण हे पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्यामुळे पत्नीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी ( दि. ३ ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहण्यासाठी गेलेल्या पती - पत्नीचा तोल गेल्याने पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. कैलास राजेंद्र चव्हाण ( वय ३८ ) आणि रेश्मा कैलास चव्हाण ( वय ३५ ) (लक्ष्मी स्पर्श सोसायटी, एनडीए गेटजवळ, कोंढवे धावडे, पुणे) अशी मयत पती - पत्नीची नावे आहेत . ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. काही नागरिकांनी अग्निशमन दलाला खबर दिल्याने नांदेड सिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्याच्या दिशेने शोधमोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह धायरी येथील कालव्यामध्ये आढळून आला. जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने कालव्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मयत कैलास चव्हाण यांचा चष्मा विक्रीचा व्यवसाय होता. तर त्यांच्या पत्नी रेश्मा ह्या संगीत विशारद होत्या. त्यांना एक चार वर्षांची मुलगी आहे.  याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार रुस्तुम शेख करीत आहेत. घटना हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने पुढील तपासासाठी हवेली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. 

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यू