शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

’तो’ दिवस आजही स्मरणात! पुणेकरांनी जागवल्या पानशेत महाप्रलयाच्या थरारक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 07:00 IST

आज महाप्रलयाची ’षष्टब्दपूर्ती’, १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात उडाला होता हाहाकार

ठळक मुद्देमहाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवस आजही विसरू शकत नाही, अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या

पुणे: जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहातो. मग ज्यांनी अशा महासंकटांपैकी एखाद्या जरी संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल? अशाच एका महासंकटात पुणे शहर १२ जुलै १९६१ या दिवशी सापडले होते. पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला तो सांगायला अनेकांचे शब्दच अपुरे पडतात.. आज या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवसआजही विसरू शकत नाही....अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या.

पुराच्या महाप्रलयाची आठवण आल्यावर आजही अंगावर शहारे येतात  

मी त्यावेळी दुसरीत होतो. नारायण पेठेत पत्र्या मारूतीजवळ पाटणकरांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. रस्त्यालगत आमचं घर होतं. सध्याच्या कोतवालवाडा ( पूर्वी जिथं विष्णुशास्त्री चिपळूणकर राहातं असतं) त्यांच्यासमोर आमचा वाडा. तो दिवस उजाडला नेहमीसारखाच. पण नियतीनं दुसरंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्यादिवशी आमच्या घरी मी आई, माझी दोन भावंडं होती. तसेच आत्या, काका वगैरे पाहुणे आले होते. वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते. सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले व धरणातून पाणी वाढू लागलं. अशा बातम्या येऊ लागल्या. नदीकाठी राहणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितलं. नंतर पाणी  वाढू लागलं अशा बातम्या यायला लागल्या.

नवीकाठी राहाणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितले. नंतर पाणी वेगानं लकडीपूलावरून वाहू लागलं व म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आलं. जनसमुदाय आम्हाला घराबाहेर जा असं सांगत होता. आई स्वयंपाक करीत होती. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. परंतु काकाच्या मदतीने आम्ही सर्व जोगेश्वरी मंदिराजवळ राहाणा-या आजीकडे गेलो आणि सुखरूप राहिलो. दुस-या दिवशी घरी येऊन पाहातो. तर घरात पाणी आल्याचं दिसलं. आई करीत असलेल्या पोळ्या चिखलात रूतून बसल्या होत्या. सगळीकडे चिखल झाला होता. वहया, पुस्तकं धान्य भांडीकुंडी सर्वच खराब झालं होतं. मुंबईच्या पेपरामधील बातमी वाचून वडील पुण्याला आले. पुराची आठवण आजही ताजी आहे. त्याची आठवण आल्यानंतर अंगावर शहारे येतात...अशी आठवण माधव ताटके यांनी सांगितली. 

त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत

मी त्यावेळी आठवीत होतो. शाळेत असतानाच आम्हाला पूर आल्याचे सांगण्यात आले आणि शाळा सोडून देण्यात आली. माती गणपतीजवळ घर असल्याने तिथे गेल्यावर गुडघ्याभर पाणी झाले होते. चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले. दुस-या दिवशी सकाळीच मावशीने आम्हा सर्वांना उठवले आणि पर्वतीवर पाठवले. पुन्हा धरण फुटले आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पाणी येणार अशी अफवा पसरली. त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत..अशा स्मृती प्रा. प्र,के घाणेकर यांनी जागविल्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणkhadakwasala-acखडकवासला