शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

’तो’ दिवस आजही स्मरणात! पुणेकरांनी जागवल्या पानशेत महाप्रलयाच्या थरारक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 07:00 IST

आज महाप्रलयाची ’षष्टब्दपूर्ती’, १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात उडाला होता हाहाकार

ठळक मुद्देमहाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवस आजही विसरू शकत नाही, अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या

पुणे: जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहातो. मग ज्यांनी अशा महासंकटांपैकी एखाद्या जरी संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल? अशाच एका महासंकटात पुणे शहर १२ जुलै १९६१ या दिवशी सापडले होते. पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला तो सांगायला अनेकांचे शब्दच अपुरे पडतात.. आज या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवसआजही विसरू शकत नाही....अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या.

पुराच्या महाप्रलयाची आठवण आल्यावर आजही अंगावर शहारे येतात  

मी त्यावेळी दुसरीत होतो. नारायण पेठेत पत्र्या मारूतीजवळ पाटणकरांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. रस्त्यालगत आमचं घर होतं. सध्याच्या कोतवालवाडा ( पूर्वी जिथं विष्णुशास्त्री चिपळूणकर राहातं असतं) त्यांच्यासमोर आमचा वाडा. तो दिवस उजाडला नेहमीसारखाच. पण नियतीनं दुसरंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्यादिवशी आमच्या घरी मी आई, माझी दोन भावंडं होती. तसेच आत्या, काका वगैरे पाहुणे आले होते. वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते. सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले व धरणातून पाणी वाढू लागलं. अशा बातम्या येऊ लागल्या. नदीकाठी राहणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितलं. नंतर पाणी  वाढू लागलं अशा बातम्या यायला लागल्या.

नवीकाठी राहाणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितले. नंतर पाणी वेगानं लकडीपूलावरून वाहू लागलं व म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आलं. जनसमुदाय आम्हाला घराबाहेर जा असं सांगत होता. आई स्वयंपाक करीत होती. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. परंतु काकाच्या मदतीने आम्ही सर्व जोगेश्वरी मंदिराजवळ राहाणा-या आजीकडे गेलो आणि सुखरूप राहिलो. दुस-या दिवशी घरी येऊन पाहातो. तर घरात पाणी आल्याचं दिसलं. आई करीत असलेल्या पोळ्या चिखलात रूतून बसल्या होत्या. सगळीकडे चिखल झाला होता. वहया, पुस्तकं धान्य भांडीकुंडी सर्वच खराब झालं होतं. मुंबईच्या पेपरामधील बातमी वाचून वडील पुण्याला आले. पुराची आठवण आजही ताजी आहे. त्याची आठवण आल्यानंतर अंगावर शहारे येतात...अशी आठवण माधव ताटके यांनी सांगितली. 

त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत

मी त्यावेळी आठवीत होतो. शाळेत असतानाच आम्हाला पूर आल्याचे सांगण्यात आले आणि शाळा सोडून देण्यात आली. माती गणपतीजवळ घर असल्याने तिथे गेल्यावर गुडघ्याभर पाणी झाले होते. चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले. दुस-या दिवशी सकाळीच मावशीने आम्हा सर्वांना उठवले आणि पर्वतीवर पाठवले. पुन्हा धरण फुटले आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पाणी येणार अशी अफवा पसरली. त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत..अशा स्मृती प्रा. प्र,के घाणेकर यांनी जागविल्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणkhadakwasala-acखडकवासला