शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वारीतले वेगळेपण : वस्त्र ल्यालेली दौंडज खिंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:11 IST

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात.

पुणे : रिमझिमणाऱ्या पावसासोबत घाटातली वाट तुडवत विठूनामाचा जयघोष करून वारकरी पंढरीकडे प्रवास करत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. या प्रवासात पाळल्या जाणाऱ्या परंपरा, रिंगण यांची ओळख दरवर्षी महाराष्ट्राला करून दिली जाते. 

   या वारीत परंपरा नसली तरी आवर्जून पाळली जाणारी सवय म्हणजे दौडज खिंडीत धुतली जाणारी वस्त्रे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आळंदीला सुरुवात होते तेव्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली असते आणि जसजशी पालखी पुढे पुढे जाते तसतसा पावसाचा जोर वाढतो आणि आषाढीपर्यंत पेरण्याही उरकलेल्या असतात. त्यामुळे पावसाच्या सोबतीने चिखलाची वाट तुडवतच दरवर्षी वारी केली जाते ज्याची वारकऱ्यांना सवय आहे. अशावेळी काही अडचणींना त्यांना तोंड दयावे लागते त्यातली महत्वाची अडचण म्हणजे कपडे वाळवण्याची. ही परिस्थिती लक्षात घेवून  जेजुरी मुक्काम उरकून पालखी वाल्हे मुक्कामाला निघाली की वाटेतल्या दौंडज खिंडीतल्या भणाणत्या वाऱ्याचा आणि विस्तीर्ण जागेचा उपयोग केला जातो. प्रत्येक ठिकाणी ठराविक काळ असलेली विश्रांती, सकाळी लवकर होणारे प्रस्थान आणि कमीवेळा होणारे सूर्यदर्शन यामुळे कपडे वाळायला अडचण होते. अशावेळी  खिंडीतल्या भल्या थोरल्या डोंगरावर कपडे धुवून सुकवण्याचे काम अनेकजण उरकून घेतात. या कपड्यांमुळे हा संपूर्ण डोंगर रंगीबेरंगी दिसत असतो. कमीतकमी साधनांमध्ये आणि आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा वारकऱ्यांचा साधेपणा या वस्त्र ल्यालेल्या डोंगराकडे बघून पटतो.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीJejuriजेजुरी