शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वारीतले वेगळेपण : वस्त्र ल्यालेली दौंडज खिंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:11 IST

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात.

पुणे : रिमझिमणाऱ्या पावसासोबत घाटातली वाट तुडवत विठूनामाचा जयघोष करून वारकरी पंढरीकडे प्रवास करत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. या प्रवासात पाळल्या जाणाऱ्या परंपरा, रिंगण यांची ओळख दरवर्षी महाराष्ट्राला करून दिली जाते. 

   या वारीत परंपरा नसली तरी आवर्जून पाळली जाणारी सवय म्हणजे दौडज खिंडीत धुतली जाणारी वस्त्रे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आळंदीला सुरुवात होते तेव्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली असते आणि जसजशी पालखी पुढे पुढे जाते तसतसा पावसाचा जोर वाढतो आणि आषाढीपर्यंत पेरण्याही उरकलेल्या असतात. त्यामुळे पावसाच्या सोबतीने चिखलाची वाट तुडवतच दरवर्षी वारी केली जाते ज्याची वारकऱ्यांना सवय आहे. अशावेळी काही अडचणींना त्यांना तोंड दयावे लागते त्यातली महत्वाची अडचण म्हणजे कपडे वाळवण्याची. ही परिस्थिती लक्षात घेवून  जेजुरी मुक्काम उरकून पालखी वाल्हे मुक्कामाला निघाली की वाटेतल्या दौंडज खिंडीतल्या भणाणत्या वाऱ्याचा आणि विस्तीर्ण जागेचा उपयोग केला जातो. प्रत्येक ठिकाणी ठराविक काळ असलेली विश्रांती, सकाळी लवकर होणारे प्रस्थान आणि कमीवेळा होणारे सूर्यदर्शन यामुळे कपडे वाळायला अडचण होते. अशावेळी  खिंडीतल्या भल्या थोरल्या डोंगरावर कपडे धुवून सुकवण्याचे काम अनेकजण उरकून घेतात. या कपड्यांमुळे हा संपूर्ण डोंगर रंगीबेरंगी दिसत असतो. कमीतकमी साधनांमध्ये आणि आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा वारकऱ्यांचा साधेपणा या वस्त्र ल्यालेल्या डोंगराकडे बघून पटतो.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीJejuriजेजुरी