शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 17:50 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग

कळस : इंदापुर तालुक्यात नुकत्याच झालेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व रविवारी(दि २५) आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या निवासस्थानी ‘लाईव्ह’ केले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग झाले आहे. या पार्श्वभुमीवर भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थानी नुतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ओळख परेड पार पडली.

यावेळी  नुतन सरपंच व सदस्यांचा फेटा बांधुन पारंपारीक पध्दतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार भरणे म्हणाले, २४६ पैकी १६० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे निवडून आले आहेत . तालुक्यात अनेक ठिकाणी पक्षाच्याच स्थानिक नेत्यांमध्ये निवडणूक झाली. मात्र पक्षाच्या विचाराच्या १८ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये काही ठिकाणी सरपंच आपला नसला तरी सदस्य बहुमताने आपलेच निवडून आले आहेत. सुमारे १६० ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. जे माझ आहे, त्यालाच माझ म्हणतो. त्यामध्ये आयुष्यात कधी खोटे बोलुन श्रेय लाटण्याचा माझा स्वभाव नाही. विरोधकांनी ग्रामपंचायतीची खोटी आकडेवारी सांगितल्याने इंदापुर तालुक्यातील लोकांमध्ये उद्रेक झाला. त्यामुळेच आजची गर्दी झाली. तालुक्यातील लोकांना ग्रामपंचायतींची खोटी आकडेवारी सांगून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना दोन वेळा जनतेने घरी बसविले आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आपण स्वत: मंजुरी आणलेले रस्ते, जलजीवन मिशनची कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीच्या, अजितदादांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे खेचून आणली. इंदापुर सहकारी साखर कारखाना, निरा भीमाची काय अवस्था आहे,वजनात पाप करण्याचा प्रयत्न केला गेला, निरा भीमा तीन तास बंद असल्याचा आरोप भरणे यांनी केला.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सहकारी संस्थांच्या राजकारणावरुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. दुधसंघ, सहकारी साखर कारखाने तोट्यात असुन आमच्या ताब्यात द्या, आम्ही चालवून दाखवतो असे आव्हान दिले. इंदापुर तालुक्यात अडीच वर्षात दत्तात्रय भरणे यांनी कोट्यावधींची विकास कामे खेचुन आणली. विरोेधकांकडे १९ वर्ष मंत्रीपद होते. या काळात त्यांनी किती विकासनिधी आणला, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यात साधे सभासद करुन घेत नाही. त्यांचे लबाडीचे राजकारण आहे. तालुक्यात १८ ग्रामपंचायती वर राष्ट्रवादीचे वर्चस्व असुन, एक संमिश्र आहे, असे असताना विरोधक उलटे चित्र दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका गारटकर यांनी केली.

...त्यांचे नेते सुध्दा यांना वैतागले आहेत

विरोधकांचा संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांपासुन सावध रहा. मुंबई,नागपुरला सगळीकडे पुढ पुढ करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरु आहे. त्यांचे नेते सुध्दा यांना वैतागले आहेत, असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला. विरोधकांनी खोटे बोल, रेटुन बोलण्याचा प्रकार लावला आहे. विरोधकांना जशतेशी काही देणेघेणे नसल्याची टीका आमदार भरणे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण