शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

डार्विनचा सिद्धांत अपूर्ण म्हणू शकतो, पण चुकीचा मानता येणार नाही - जयंत नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 20:41 IST

जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांना टोला लगावत एका शास्त्रज्ञाची पाठराखण केली.

पुणे : जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विननेजीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो  पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांना टोला लगावत एका शास्त्रज्ञाची पाठराखण केली.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, संशोधन आणि आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुस-या पुणे साय फाय महोत्सवात विज्ञान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, माजी खासदार प्रदिप रावत यावेळी उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी डार्विनचा सिध्दांत चुकीचा असल्याचे म्हटले होते यासंदर्भात डॉ. नारळीकर यांना  विचारले असता ते म्हणाले, चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसंदर्भात मांडलेले तर्क बरोबर वाटतात. कारण ते अनेक निरिक्षणातून सिध्द झाले आहेत. परंतु त्यात जाणून घ्यायच्या पुष्कळ गोष्टी आहेत. ज्या आपल्याला माहिती नाहीत. डार्विनचा सिध्दांत अपूर्ण म्हणू शकतो, परंतु तो चुकीचा नक्कीच नाही.नारळीकर म्हणाले, केंब्रिज  विद्यापीठात असताना  मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्याकडून प्रेरणा घेऊन मराठी भाषेत विज्ञानलेखन करायला मी सुरुवात केली. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा परंतु मराठीमध्ये लिहिण्यात येणा-या विज्ञान कथा भयकथा वाटतात, त्यासाठी लेखन आणि विज्ञानाचा समतोल राखणे गरजेचे आहे.सामान्य माणसाला विज्ञान किती आणि कसे समजते हे शास्त्र आणि अभ्यासक लक्षात घेत नाहीत. मी स्वत:ला चांगला साहित्यिक मानत नाही. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखातून विज्ञान किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यत पोहोचते मला माहिती नाही, त्यासाठी चांगल्या मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानासंदर्भात लेखन केले पाहिजे याकडे नारळीकर यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेJayant Narlikarजयंत नारळीकर