शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

डार्विनचा सिद्धांत अपूर्ण म्हणू शकतो, पण चुकीचा मानता येणार नाही - जयंत नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 20:41 IST

जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांना टोला लगावत एका शास्त्रज्ञाची पाठराखण केली.

पुणे : जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विननेजीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो  पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांना टोला लगावत एका शास्त्रज्ञाची पाठराखण केली.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, संशोधन आणि आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुस-या पुणे साय फाय महोत्सवात विज्ञान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, माजी खासदार प्रदिप रावत यावेळी उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी डार्विनचा सिध्दांत चुकीचा असल्याचे म्हटले होते यासंदर्भात डॉ. नारळीकर यांना  विचारले असता ते म्हणाले, चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसंदर्भात मांडलेले तर्क बरोबर वाटतात. कारण ते अनेक निरिक्षणातून सिध्द झाले आहेत. परंतु त्यात जाणून घ्यायच्या पुष्कळ गोष्टी आहेत. ज्या आपल्याला माहिती नाहीत. डार्विनचा सिध्दांत अपूर्ण म्हणू शकतो, परंतु तो चुकीचा नक्कीच नाही.नारळीकर म्हणाले, केंब्रिज  विद्यापीठात असताना  मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्याकडून प्रेरणा घेऊन मराठी भाषेत विज्ञानलेखन करायला मी सुरुवात केली. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा परंतु मराठीमध्ये लिहिण्यात येणा-या विज्ञान कथा भयकथा वाटतात, त्यासाठी लेखन आणि विज्ञानाचा समतोल राखणे गरजेचे आहे.सामान्य माणसाला विज्ञान किती आणि कसे समजते हे शास्त्र आणि अभ्यासक लक्षात घेत नाहीत. मी स्वत:ला चांगला साहित्यिक मानत नाही. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखातून विज्ञान किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यत पोहोचते मला माहिती नाही, त्यासाठी चांगल्या मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानासंदर्भात लेखन केले पाहिजे याकडे नारळीकर यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेJayant Narlikarजयंत नारळीकर