धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच मागे घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:45 AM2018-12-09T04:45:15+5:302018-12-09T04:45:39+5:30

लोकअदालतीत असाही न्याय; महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले

Daredevils got stolen, but after 37 years the prosecution withdrew | धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच मागे घेतली

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच मागे घेतली

Next

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र, जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फिर्यादी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला.

प्रवासादरम्यान ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेतला. शनिवारी लोकन्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणाºया त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ्याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरित संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्व्हे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्याचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हा
गुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रवींद्र कांबळे यांनी प्रयत्न केले.

व्यवसायिकाच्या कुटुंबियांना ४५ लाखांची नुकसानभरपाई
अपघातात मृत्यू झालेल्या फरशी बसविणा-या ठेकेदाराच्या कुटुंबियांना तब्बल ४५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरजित रामनरेश सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी, दोन मुले, आई-वडिलांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.

समन्समुळे मुलाने बोलणे सोडले
गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फिर्यादीवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फिर्यादीबरोबर बोलणेच सोडून दिले होते, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबाबत भीती असल्याचे पुढे येते, असे कोळी म्हणाले.
 

Web Title: Daredevils got stolen, but after 37 years the prosecution withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.