शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणे खड्डे : प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:48 IST

अपघाती रोड म्हणून बनत आहे ओळख;

ठळक मुद्देभिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज एक अपघात होत असल्याची माहितीरावणगाव ते डाळज पळसदेव टप्प्यात खड्ड्यांची मालिका तयार

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर रावणगावपासून पळसदेवपर्यंत दोन्ही लेनवर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. यात वाहनांच्या नुकसानाबरोबरच नागरिकांचे जीव जात असताना टोल प्रशासन याकडे   गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतपासून इंदापूरपर्यंतच्या टप्प्याचे नूतनीकरणाच्या कामाला ५ वर्षे उलटून गेली आहेत. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे ५ वर्षांत रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. मात्र प्रत्येक वेळी टोल प्रशासन तसेच महामार्ग प्रशासन यांच्याकडून तात्पुरती ठिगळी लावून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रावणगाव ते डाळज पळसदेव टप्प्यात खड्ड्यांची मालिका तयार झाली असून, या खड्ड्यांमुळे दिवसात एक-दोन अपघात घडत आहेत. अचानक समोर आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या गाडीशी टक्कर होऊन अपघात होत आहेत. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर रोज एक ते दोन अपघात असल्याची माहिती मिळत आहे. याकडे टोल प्रशासन व महामार्ग प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहे. याबाबत टोल प्रशासनाकडे अनेक वाहनधारकांनी तक्रार केली तरी पहिल्या कंपनीचा करार संपला असल्यामुळे नवीन कंपनीच्या ताब्यात रोडची सूत्रे गेल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र ताबा कोणत्याही कंपनीकडे असला तरी टोल कलेक्शन थांबविण्यात येत नसेल तर दुरुस्तीचे काम का थांबविण्यात येते, असा सवाल उपस्थित होतो. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे मान्य करीत खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित कंपनीला दोषी धरून अगदी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान असल्याचे सांगितले. तसेच पोलीस ठाणे हद्दीत अपघात घडल्यास आपण संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.अनधिकृत पार्किंग, अवैध व्यावसायिकांचे महामार्गावरील अतिक्रमण तसेच महामार्गाच्या शेजारीच भरणारे आठवडे बाजार यामुळे सर्वात अपघाती रोड म्हणून पुणे-सोलापूर महामार्गाची ओळख बनत आहे. तर करोडो रुपये टोलच्या माध्यमातून कमविणारी टोल कंपनी आणि यावर नियंत्रण असणारे नॅशनल हायवे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडून अनेकांना जिवाला मुकावे लागत आहे. तर काहींना जन्माचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांना सुलतानी दंड आकारणाºया सरकारने सुविधांकडे ध्यान देणे गरजेचे आहे...........

वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडलेले असून, या महामार्गाची दुरवस्था झाली आहे; मात्र याकडे टोल कंपनी दुर्लक्ष करीत आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंडजवळ कौठीचा मळा परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या महामार्गावर पाटस येथे टोलवसुली जोरदार चालू आहे व या टोल कंपनीची एक गाडी देखरेख करण्यासाठी पाटस ते यवत असे सतत लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असते. त्यांना हे खड्डे दिसत नाही का, का जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. जर पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने याबाबत टोल प्रशासनाला सांगितले असेल, तर याकडे टोल कंपनी सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे; तसेच वरवंड येथील वरवंड-चौफुला सर्व्हिस रस्ताही मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.पाटस येथे टोल कंपनी जोरदारपणे टोलवसुली करीत असून ते रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. जर टोल कंपनी टोल घेत आहे, मग रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्त करणार तरी कोण, असा प्रश्न प्रवासीवर्ग करत आहेत.

टॅग्स :BhigwanभिगवणAccidentअपघातPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षा