शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

जेजुरीत १६५ ठिकाणी डेंगीच्या अळ्या; बारामती, पुरंदरमध्ये आरोग्य विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:56 IST

जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असता एक महिन्याच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये सुमारे १६५ ठिकाणी साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

जेजुरी : जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असता एक महिन्याच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये सुमारे १६५ ठिकाणी साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. १२५ ठिकाणची निवासस्थाने दूषित आढळून आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.तपासणी केल्यानंतर संबंधित घरमालकांना आरोग्य विभागाच्या वतीने नोटीस देण्यात येऊन आवश्यक त्या सूचना व उपाययोजना करण्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नागरिक सूचना देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचे आरोग्यसेवक सुभाष गायकवाड व संतोष भोसले यांनी सांगितले.शहराला पाणीपुरवठा करणारे नाझरे जलाशय पूर्णत: कोरडा पडल्याने सध्या मांडकी डोहावरून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्याअनुषंगाने नागरिक आपल्या घरामध्ये दैनंदिन वापरासाठी पाण्याची साठवण करतात. एक महिन्याच्या कालावधीत सुमारे शहराच्या विविध भागांतील सुमारे १९३९ घरे तपासण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने मुख्य गावठाण, जुनी जेजुरी, लवथळेश्वर, खोमणे आळी, गडकोट पायथा, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणांमधील नागरिकांच्या साठवलेल्या पाण्यात डेंगी डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्यात जंतुनाशक औषध टाकून तत्काळ पाण्याची भांडी रिकामी करण्यात आली आहेत. काही नागरिकांना त्याबाबत आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत.लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : डेंगीच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांचे ठिकाण नष्ट करण्याची मोहीम बारामती नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील जुन्या हॉटेल कृषिराजच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून साठलेल्या पाण्यात डासांचे आगर झाले आहे. त्याची तपासणी तालुका आरोग्याधिकारी, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांनी केली. नगरपालिकेचे आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक पाहणीसाठी गेलेले असताना हॉटेलमालकाने एकेरी भाषेत त्यांना धमकावल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या आजी-माजी नगरसेवकांसमोर हॉटेलमालकाची मुजोरी अधिकाºयांना ऐकावी लागली.बारामती शहरात डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तो रोखण्यासाठी पाणी साठवण असलेले ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बारामती शहरातील हॉटेल कृषिराज जुने हॉटेल आहे. त्या ठिकाणी लॉजिंगची सुविधादेखील आहे. या हॉटेलच्या तळमजल्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साठले आहे. जवळपास दीड ते दोन हजार चौरस फुटाच्या परिसरात कमालीची दुर्गंधी आहे. दारूच्या मोकळ्या झालेल्या बाटल्यादेखील त्याच ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत. साठलेल्या पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी हॉटेलशेजारीचराहत असलेले माजी नगरसेवक शाम इंगळे यांनी अनेकदा केली. हॉटेलमालकांशीदेखील याबाबत त्यांनी अनेकदा चर्चा केली. परंतु, तळमजल्यातील पाणी उपसा करण्याची तसदी घेतली नाही.आज पंचायत समितीचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश जगताप यांच्यासह कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणारे हिवताप नियंत्रण कर्मचाºयांनीदेखील त्याची पाहणी केली. तळमजल्याला मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यात डास व डेंगीला आमंत्रण देणाºया डासांच्या आळ्यांचे साम्राज्यच असल्याचे दिसून आले. दुपारी नगरपालिकेचे आरोग्याधिकारी रवींद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले असताना हॉटेलमालक विक्रांत जाचक यांनी पाणी उपसा केला जाईल, असे न सांगता थेट अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली. एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना नगरसेवक गणेश सोनवणे यांनी त्या हॉटेलमालकालासांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनादेखील न जुमानता अरेरावी चालूच ठेवली. अखेर माजी नगरसेवक शाम इंगळे यांनी समजावून सांगितले. त्याच दरम्यान, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीलिमा मलगुंडे या तिथे आल्या. या प्रकाराची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनादेखील दिली.हॉटेलमालकाची मुजोरीतालुका आरोग्याधिकाºयांनी केलेल्या पाहणीत गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या पाण्याचा उपसा झालेला नाही, असे निदर्शनास आले. जवळपास दीड ते दोन फूट पाणी तळमजल्यात आहे. संपूर्ण बारामती शहराचे आरोग्य धोक्यात येईल, अशीच स्थिती असताना हॉटेलमालकाने नमती भूमिका न घेता अंगावर धावून जाऊन नगरपालिकेच्या कर्मचाºयांना वापरलेल्या अरेरावीच्या भाषेमुळे अधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्या अरेरावीला न जुमानता नगरपालिका अधिकाºयांनी हॉटेलच्याच कर्मचाºयांची मदत घेऊन जवळपास १० लिटर आॅईल या पाण्यात टाकले. मात्र, हॉटेलमालकाने कोणतीही दखल न घेता तेथून निघून गेला. डासांच्या अळ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पाणी उपसा करणेच गरजेचे आहे. त्यानंतर आलेल्या त्याच्या भावाने मात्र सामंजस्याची भूमिका घेऊन नगरपालिकेच्या अधिकाºयांना पाण्याचा उपसा केला जाईल, असे सांगितले. शेजारीच राहत असलेले माजी नगरसेवक शाम इंगळे यांच्या मुलाला मागील वर्षी डेंगीच्या आजाराने ग्रासले होते. तेव्हापासून त्यांनी त्या पाण्याचा उपसा करावा, असे सातत्याने सांगितले.शेजारच्या इमारतींच्या तळमजल्यात डास...त्याचशेजारी असलेल्या काळे प्राईड या व्यापारी इमारतीमध्ये पार्किंगसाठी असलेल्या तळमजल्यावर पावसाचे पाणी साठले आहे. अगदी या इमारतीच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत साठलेल्या पाण्यातदेखील डासांच्या अळ्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. या इमारतीमध्ये असलेल्या पंक्चरच्या दुकानात पंक्चर काढण्यासाठी साठवलेल्या पाण्याच्या टँकमध्येदेखील डासांच्या अळ्या आढळून आल्या....तर फौजदारीकारवाई होणारदरम्यान, हॉटेलमालकाने केलेल्या अरेरावीची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आली. तसेच मुख्याधिकाºयांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तरीदेखील पाण्याचा उपसा न केल्यास फौजदारी कारवाई करण्याची तयारी नगरपालिका प्रशासनाने ठेवली आहे. याशिवाय हॉटेलचा परवानादेखील रद्द करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत.साठवलेल्या स्वच्छ पाण्यातूनच डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात.घरानजीक टायर, नारळाच्या करवंट्या, पत्र्याचे डबे, बाटल्या, प्लॅस्टिकची भांडी किंवा पावसाचे पाणी साचून राहील, असे साहित्य ठेवू नये ते नष्ट करावे. पाणी साठवणारी भांडी उदा. रांजण, माठ, हौद, मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आदी किमान आठवड्यातून एक दिवस मोकळे करून कोरडे ठेवावेत.पाणी भरल्यानंतर झाकणे लावून बंद करावीत. मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे मोफत नगरपालिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत ते नेऊन सोडावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.